Tuesday, 27 August 2024

शरीरात वाताचे कार्य

वायु हा संपूर्ण शरीरात अखंडपणे फिरत असतो.

मोठे आतडे (पक्वाशय),कंबर, मांडया,कान,हाडे, त्वचा हे त्याचे ठिकाण आहेत 

त्यात सुद्धा त्याचे मुख्य ठिकाण मोठे आतडे (पक्वाशय) आहे.

*वायु ज्याठिकाणी जाईल त्यानुसार तेथे त्याचे नाव दिले जाते. प्राण,उदान,व्यान, समान,अपान असे 5प्रकार.

************

*प्राण वायु- हा वायु शिर/ डोके येथे असतो.

छाती व कंठ ह्या ठीकाणी फिरतो. बुद्धी,हृदय, इंद्रिय व मन ह्यांचे कार्य नियंत्रण करतो

*उदान वायु - हा छातीच्या ठिकाणी असतो. तो नाक,नाभी, गळा ह्याठीकाणी फिरतो.

बोलणे,उत्साह,ऊर्जा, ताकद, शरीराचा रंग,आणि स्मरण शक्ती ह्याचे नियंत्रण करतो

*व्यान वायु - मुख्यतः हृदयात असतो. तो संपूर्ण  शरीरात फिरतो. इतर वायूंच्या तुलनेने ह्याचा वेग अधिक असतो.

चालणे, हातापायांना वर खाली करणे, डोळे उघडणे बंद करणे साधारणपणे अवयवांच्या सर्व क्रिया हा वायुचे नियंत्रण करतो

*समान वायु-पचन करणाऱ्या अग्निजवळ,ग्रहणी मध्ये  असतो. संपूर्ण पचन संस्थेमध्ये (कोष्ठ) फिरतो.

अन्न ग्रहण करणे,पचवणे, सारभाग व मल मूत्र वेगळे करणे, व पचनसंस्थेतील पदार्थ खालच्या दिशेने ढकलणे हे कार्य नियंत्रित करतो

*अपान वायु - हा मुख्यतः गुदा (Anus) च्या ठिकाणी असतो .

हा श्रोणी  (pelvic including pelvic organs), बस्ती मेहन (bladder- urethra), मांडया, ह्या भागात फिरतो.

-शुक्र, आर्तव, मल,मूत्र, व गर्भ बाहेर काढण्याचे नियंत्रण तो करतो.

**************

संदर्भ - अष्टांग हृदय सुत्रस्थान 12/1,4-9

दूध, दूध, दूध रोज प्यावे दूध

 भेसळ नसलेले #दूध हे पृथ्वीतलावरील अमृत आहे.

विशेषतः आजारी व्यक्तीने, औषधी घेणारे,प्रवास करणारे ,भाषण देणारे, स्त्री सेवन करणारे, उन्हात काम करणारे,श्रमिक, कष्ट करुन थकलेले ,वृद्ध व बालक यांनी औषध ,अन्नपदार्थासोबत रोज दूध  प्यावे. 

दूध अनुपान म्हणून पिणे अमृतासमान आहे.

*************

***व्याध्यौषधाध्वभाष्यस्त्रीलंघनातपकमभि: l

क्षीणे वृद्धे च बाले च पय: पथ्यं यथा S मृतम् ll

संदर्भ:- अष्टांग हृदय सूत्रस्थान 8/50

****************

आयुर्वेद शास्त्रातील प्रत्येक सूत्र हे अनेक परीक्षणे करुन मांडलेली आहेत.

आयुर्वेदानुसार दूध हा प्राणिज पदार्थ आहे. त्यामुळे वनस्पती पासून तयार केलेले दूध येथे अपेक्षित नाही.

* त्या त्या प्रांतातील देशी गायीचे दूध अपेक्षित आहे. नसल्यास बकरीचे, म्हशीचे दूध उपयोगात आणावे.

*ज्यांना दूध प्याले असता त्रास होतो त्यांना क्रमाने थोडे दूध देऊन दूध पचण्यासाची तयारी करता येते.

*आहारात थोडा बदल केला तर

 #lactose intolerance कमी होतो हा आमचा अनुभव आहे.

*************

Vd Pratibha Bhave 

Ayurvedic Gynaecologist Pune 

8766740253

आजारपण टाळण्यासाठी योग्य आहार पदार्थ निवडावे

 *पनीर,दही, चीझ,

*सोडा, खार, 

*कोवळा मुळा, उडीद, वाल - पावटा ,

* शालूक - आलू सारखे कंद ,

* पिष्टमय पदार्थ, अंकुरीत धान्य, 

*सुकलेल्या भाज्या 

*, जव/यव पासून बनवलेले पदार्थ, 

*फाणित(राब) ,

* सुकलेले मास, सुकलेली माझे, बारीक असलेल्या पशुंचे मांस.

हे सर्व पदार्थ रोज खाऊ नये.

म्हणजे कधी कधी खाल्ले तर चालतात.

************

संदर्भ:- अष्टांग हृदय मात्राशितिय अध्याय/40-50

***********

Vd Pratibha Bhave 

Ayurvedic Gynaecologist Pune 

8766740253

कफ वाढवणारे पदार्थ

 साधारण पणे नेहमीच्या व्यवहारात असलेली ही पदार्थ कफ वाढवतात.

*पिकलेली केळी, केळफूल,

*आंब्याचे पन्हे, 

*दही, दूधाचे पदार्थ

*शहाळे, लौकी, 

*नविन धान्य, नविन मडक्यातील किंवा माठातील अतिशय गार पाणी

* नविन चिंचा, आंबट बोरं,करवंद, कच्चे पेरु

*तीळ तेल,कच्चे तूप - उत्तम प्रकारे न कढवलेले तूप 

****************

संदर्भ:- आयुर्वेद सारसंग्रह पान नं 54

*************

Vd Pratibha Bhave 

Ayurvedic Gynaecologist Pune 

8766740253

जेवण करतांना आहार पदार्थांचा क्रम कसा असायला हवा?

***************

*पचायला जड, तळलेले,गोड पदार्थ आधी खावे.

जसे :-लाडू, पुरणपोळी, अनारसे, रसगुल्ला, 

गुलाबजामुन,मोदक ,नारळ- आंबा फळ, केळ, कमळ कंद, रताळी, ऊस 

*पचायला हलके,तिखट,पातळ, चमचमीत, तीक्ष्ण पदार्थ शेवटी खावे.

 जसे :-पापड, चिप्स, फरसाण, चिवडा,शेव,भजी, इत्यादी 

*आंबट, खारट, पदार्थ जेवणाच्या मध्यात खावे.

जसे:- कढी, रायता,सूप ,ताक, लोणची 

***************

संदर्भ:- अष्टांग हृदय सूत्रस्थान 8/45

--------------------------------------

Vd Pratibha Bhave 

Ayurvedic Gynaecologist 

8766740253

गर्भ प्राप्ती साठी वाजीकरण आयुर्वेदीक उपचार

 *उत्तम संतती निर्माण व्हावी तसेच ज्यांना गर्भधारणा होत नाही, स्त्रीसंग करण्यास अडथळा येतो त्यांनी 

वाजीकरण उपचार करावे.

* रसायन चिकीत्सा केल्यानंतर च वाजीकरण चिकीत्सा करावी लागते

* वाजीकरण वारंवार करावे लागते. रसायन चिकित्सा मात्र वर्ष- दोन वर्षांतून तून एकदा केले तरी उपयोग होतो 

*वाजीकरण केल्याने मन प्रसन्न होते.

 शरीर पुष्टी होते, गुणवंत अपत्य प्राप्ती होते

अबाधित वंशपरंपरा सुरु होते( sex hormones normal होतात) व संप्रहर्षण, स्त्रीसंग प्रवृत्ती साठी इच्छा व शक्ती येते .

वाजीकरण उपचाराने शरीराला बल व तेज विशेष रुपात मिळते. त्यामुळे पुरुष आकर्षक होतो.

……..भवत्यतिप्रिय:  स्त्रीणाम् येन येनोपचीयते l

     तद्वाजीकरणं तद्धी देहस्योर्जस्करं परम् ll

          संदर्भ:-अष्टांग हृदय वाजीकरणविधि:

***************

Vd Pratibha Bhave 

Ayurvedic Gynaecologist 

MD Ayu obstetrics and gynaecology 

Pune.

8766740253

नस्य , वमन, विरेचन, बस्ती , रक्तमोक्षण हे पंचकर्म आहेत.

 निरोगी व्यक्तीला पंचकर्म करायचे झाल्यास

*नस्य 

*#वमन केल्यावर 15 दिवसाने विरेचन करावे.

*#विरेचन केल्यावर 15दिवसाने निरुहबस्ति(काढया चा) 

*निरुह बस्ति नंतर लगेच अनुवसान बस्ती(तेलाचा).

**************

मसाज करणे, स्टीम देणे हे पंचकर्माचे पूर्व तयारी आहे .

*नस्य म्हणजे नाकात औषध सोडणे.

*वमन म्हणजे उलट्या करवणे.

*विरेचन म्हणजे शौचास करवणे.

*बस्ती - औषधी गुद मार्गाने आत टाकणे 

*रक्तामोक्षण म्हणजे शरीरातील रक्त बाहेर काढणे.

पंचकर्म करताना  क्रम आवश्यक आहे.

 वमन केल्यावर ,विरेचन केल्यावर ,बस्ती केल्यावर लगेच नस्य करणे हा विरूद्ध उपक्रम आहे.तसेच बस्ती नंतर विरेचन ,वमन-विरेचानानंतर वमन करणे हा विरुद्ध उपक्रम आहे त्यामुळे अनेक आजार होऊ शकतात.

पंचकर्मचिकित्सा घेतांना क्रम आवश्यकच आहे.

**************

एका व्यक्तीला संपूर्ण पंचकर्म करायला कमीत कमी #दीड महिना तरी द्यावा लागतो. 

एक , दोन ,पाच दिवसात होणारे असे पंचकर्म नसते. तसेच ऋतु, वय,आजार हे बघून आवश्यकतेप्रमाणे नस्य,वमन,विरेचन,बस्ती यापैकी उपचार केले जातात.

***************

Vd Pratibha Bhave Pune 

Ayurvedic Gynaecologist 

8766740253

प्रसूति करणाऱ्या व्यक्तीचे गुण

 #आयुर्वेद मते 

जी नर्स किंवा डॉक्टर/वैद्य आपल्या रुग्णा ची प्रसूति(delivery) करणार आहेत, त्यांच्यामध्ये पुढीलप्रमाणे गुण असावे

1)प्रेमळ/ सौहार्द्र (good harted)

2) सेवा तत्पर (busy in service)

3) उत्तम आचरण असणारी (good character)

4)  प्रसव करण्याचा भरपूर अनुभव (experienced in conducting the labour)

5) प्रेमळ स्वभाव (affectionate in nature)

6) दुःख नसलेली (free from grief )

7) सहनशील (good indurance)

8) प्रसूत होत असलेल्या स्त्रीचे मन प्रसन्न ठेवणारी


संदर्भ:- चरक शा.8/34

****************

Vd Pratibha Bhave 

Ayurvedic Gynaecologist Pune

9890849016

गर्भिणी ने कमलकाकडी खावी

-#कमलकाकडी चवीला गोड, तुरट,किंचित कडवट असते

- थंड गुणाची असते.

- #गर्भ राहण्यासाठी,गर्भ टिकण्यासाठी औषध म्हणून आयुर्वेदात ह्याचा उपयोग केला जातो. त्याला #प्रजास्थापन करणारे औषध म्हटले आहे

-#गर्भिणी ला अगदी पहिल्या महिन्यापासून द्यावी.

- दुधात किसून उकळून,खीर, भाजी अश्या अनेक पद्धतीने देता येते. दूध आवडत नसेल तर किसून उकळून त्याचा काढा प्यावा. मळमळ, उलटी थांबते.

- त्वचेचा वर्ण सुधारण्यासाठी उपयोग होतो.

- गर्भपात थांबण्यासाठी अतिशय उपयोगी आहे.

- नऊ महिन्यापर्यंत आहारात उपयोग केला तर गर्भ पुष्ट होते.

- तसेच त्यात शरीरातील विषारी तत्त्व काढून टाकण्याचा गुण आहे.

**************

संदर्भ:- सु. शा.10/57

  अ. सं.शा. 4 / 5

  अ. हृ. शा. 2 / 3-6

**पावसाळ्यात ताजी कमळ काकडी मिळते.

**गर्भिणी ने  त्याची भाजी,खीर,काढा जसे आवडेल त्याप्रमाणे आहारात समावेश करावा.

**मी कालच केली भाजी. बनवायला सोपी आहे .मला आवडते. लहान मुले आवडीने खातात. पौष्टिक आहे..

**मी केलेल्या भाजीचा फोटो टाकला आहे.

भाजी दिसायला छान, चवीला छान आणि आरोग्यासाठीही उपयोगी आहे.

***मैत्रिणींनो नक्की करुन बघा आणि कळवा.

**************

Vd Pratibha Bhave 

Ayurvedic Gynaecologist Pune . 

8766740253

************

https://www.instagram.com/reel/C-SoRLCy6mC/?igsh=MWx3NjRwZ2k3bjVrbw==

गर्भिणी अवस्थेत बाळाचे वजन वाढवण्यासाठी

 *गर्भाची योग्य प्रकारे वजन न वाढणे(#IUGR) ह्याची आयुर्वेदात अनेक कारणे सांगितली आहेत.

* गर्भाचे वजन वाढावे म्हणून आहारीय पदार्थ, औषधे सांगितली आहेत. 

* तसेच #गर्भिणीचे मन प्रसन्न ठेवावे असे सांगितले आहे.

****************

सकाळी उपाशीपोटी अंडी तुपामध्ये भाजून खावी.

पाण्यातील प्राण्यांचे मांस,जसे मासे तुपामध्ये भाजून खावी

कोंबडीचे मांस खावे

************

#शाकाहारी:-

*उडीदाची साल काढून दूध व पाणी ह्यात कुटून  ते     तुपात शिजवून खावे.

*बकरीचे तूप, बकरीचे दूध प्यावे. *जिवंती,जेष्ठमध,कोकोली अशा जीवनीय औषधी भातामध्ये शिजवून पेज प्यावी.

*   #विदारीकंद ह्या औषधाचा गर्भ वजन वाढण्यासाठी फारच उपयोगी आहे. 

त्यासाठी #जेष्ठमध व विदारीचा काढा दुधात शिजवून पिण्यासाठी दिल्यास गर्भाचे वजन वाढते.

*#वचा घृत, गुग्गुल्वादी घृत,महापैशाचिक घृत, दशमुळ घृत,याचा उपयोग होतो.

*#सारिवा,जेष्ठमध,#काश्मरीफळ हे दुधात शिजवून गाळून साखर मिसळून प्यावे 

*जे पदार्थ गोड चवीची असून वात कमी करतात व मांस वाढवतात अशी पदार्थ गर्भिणी ने खावी.

जसे द्राक्षा, मनुका,बदाम,पिस्ते,खजूर,इत्यादी.

*************

#बस्ती काल प्राप्त झाल्यावर म्हणजे 32 wks झाल्यावर बस्ती द्यावी.

  विशेष #बस्ती सांगितल्या आहेत.त्यांचा चांगला उपयोग होतो. 

             ** दुग्ध सैंधव बस्ती देऊन त्यावर 

विदार्यादी सिद्ध घृत अनुवासन बस्ती .

*************

संदर्भ:- अ. हृ. शा.2/20 अरुण दत्त टीका

          अ. ह्र. चि 21/21,22

          सु. शा.10/57

          अ. सं. शा.4/19-20

          अ . सं. चि.23/12

           च. चि.28/96

***************

टीप:- आयुर्वेदाची माहिती सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही माहिती आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावे.

काही अवस्थेत ,जसे #gestational diabetes, #hypothyroidism मध्ये असा आहार घेता येत नाही

***************

Vd Pratibha Bhave 

MD Ayu obstetrics and gynecology 

8766740253

Pune

खेळाडूंसाठी मालिश

 खेळाडूंची व्यायाम शक्ती वाढवण्यासाठी,अवयव व मांसपेशींची लवचिकता व शक्ती वाढवण्यासाठी

 विशिष्ट प्रकारचा मसाज  करावा लागतो.

*************

ह्या मसाज चे 5प्रकार आहेत

1)Effleurage (stroking) –

2)Petrissage (kneading) – 

3)Tapotement (Rhythmic Striking) 

4)Friction

5)Vibration


 ज्यांना खेळात रुची आहे त्यांनी हा मसाज करावा.

त्यामुळे:-

शरीराची लवचिकता वाढते 

इजा होण्यापासून संरक्षण होते

खेळात कामगिरी सुधार होतो

सहनशक्ती वाढते

इजा झाल्यास लवकर भरुन येताततसेच शरीरातील विषारी तत्त्व निघून जातात. रक्त प्रवाह सुधारतो , शरीराचे आवश्यक पोषण तत्वे व रक्त त्या अवयवापर्यंत उत्तम प्रकारे पोहचतात.

अंग दुखणे, थकवा येणे,मांसपेशी आखडणे हे बरे होत.

मनावरचा ताण कमी होतो, झोप छान येते, उत्साह येतो .

****************हा मसाज कधी करावा:-

*स्पर्धेच्या आधी 

*स्पर्धेच्या नंतर

*स्पर्धेसाठी शरीर नेहमीच तयार असावे म्हणून आठवड्यातून एक वेळा .

***************

Vd Pratibha Dhananjay Bhave 

8766740253

उन्माद (Insanity/Psychotic disturbed)

 उन्माद हा एक प्रकारचा मानसिक आजार आहे.

हा आजार टाळता येण्यासारखा आहे.

************

 उन्माद कशामुळे व कसा होतो ? ह्याचे उत्तर संक्षेपात आयुर्वेदात पुढील प्रमाणे आहे.:-

संदर्भ:- अष्टांग हृदय उत्तरस्थान 6/2-5,59-60

*विकृत,अहितकर ,मलिन , न पचणारे , विषम अन्न खाणे, विष युक्त अन्नपान.

त्यामुळे शारीरिक वात, पित्त ,कफ बिघडल्याने

* रज तम गुण वाढवल्यामुळे मन दूषित होतात.

* शरीर व मनाने दुर्बल असलेली व्यक्ती,  चिंताग्रस्त ,शोक युक्त असेल, चित्त चंचल असेल तर मन आणखी दुर्बल होते.

*हे शारीरीक व मानसिक दूषित दोष दुर्बल मनाच्या मनुष्याच्या हृदयात जाऊन मग बुद्धीला दूषित करतात.

ह्यामुळे मनाचे कार्य करण्याची पूर्ण प्रणाली नष्ट होते.

* त्यामुळे  व्यक्ती ची बुद्धि, विज्ञान,स्मरणशक्ती भ्रमित  होते.व त्याला सुख - दुःख ह्यातील भेद कळत नाही व 

विनाकारण निरनिराळ्या विचित्र क्रिया करत राहतो.

***************

आयुर्वेद मते उन्माद हा मानसिक आजार आहे.

त्याचे 6प्रकार सांगितले आहेत.

वातपित्त बिघडल्याने होणारे- 4प्रकार  

मानसिक दुःखामुळे होणारा -1

विषामुळे होणारा -1

असे 6 प्रकार.

************

असे मानसिक आजार होऊ नये म्हणून:-

1)हितकर,ताजे,पवित्र, पचायला हलके, नियम पूर्वक भोजन करावे.मांस मद्य सेवन करु नये. 

2)प्रयत्न पूर्वक पवित्र राहावे. मनाचा सत्व गुण वाढवण्यासाठी प्रयत्न करावे. 

*****************

Vd Pratibha Bhave Pune 

8766740253

बाळंतिणीला दूध भरपूर यावे म्हणून

 *भरपूर आराम करावा. कुठलेही शारीरिक व मानसिक कष्ट नको. भरपूर झोप घ्यावी.

*मन प्रसन्न ठेवावे.

*तिने जमेल तेवढे दूध प्यावे

*तेल तूप खावे

*लसूण कांदा खावा 

*शिंगाडा, नारळ, दुधी भोपळा, मोहाची फुले, कमलकाकडी, मासे, तीळगुळाचे लाडू, गहू, तांदूळ , यव धान्य खावे.

* दुर्वा,ऊस ह्यांच्या मुळ्या स्वच्छ कुटून धुऊन दुधात शिजवाव्या. ते दूध गाळून त्यात गुळ मिसळून प्यावे 

*शतावरी, विदारी कंद दूधात शिजवून प्यावे.

*अन्न पदार्थ पातळ,गोड, आंबट,खारट चवीचे खावे.

****************

संदर्भ:- काश्यप सूत्रस्थान 19/10-25

         भा.प्र. पू.4/11-13-15.

          यो. र. क्षीरदोष चि.

**************

Vd Pratibha Bhave 

Ayurvedic Gynaecologist Pune 

8766740253

बस्ती कर्म - लवकर म्हातारपण येऊ नये म्हणून

 *गुद मार्गाने निरनिराळी औषधी युक्त तेल, काढा,दूध , दिली जातात. रोग्याचे वय, आजाराचे स्वरुप,ऋतु, इत्यादींचा विचार करुन ती दिली जातात.

*बस्ती बालक, युवा, वृद्ध सर्वांना देता येते.

*निरोगी व्यक्तिला सुद्धा लवकर वृद्धावस्था येऊ नये ह्यासाठी बस्ती चिकित्सा अवश्य करावी. 

*बस्ती ही वयाचे स्थापन करते. म्हणजे वय वाढण्याची चिन्हे लवकर दिसत नाही,

जसे चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे, 

वांग, केश पांढरे होणे, इंद्रिय शक्ती कमी होणे.

*बस्ती मुळे विशेषतः शुक्र वाढते तसेच शरीरातील ताकद वाढते(शुक्रबलप्रदश्च).

शरीराचा वर्ण सुधारतो. चेहऱ्याला टवटवीत पणा येतो.

*बस्ती मुळे शरीरात साठलेले सर्व विषारी पदार्थ शरीराच्या बाहेर पडतात. सर्व शरीर त्यामुळे शुध्द होते . भूक योग्य प्रकारे लागते.शरीराला हलकेपणा येतो. मल मूत्र प्रवृत्ती योग्य प्रकारे होते.

* झाडाच्या मूळाला योग्य प्रकारे सिंचन केले,पाणी घातले तर त्याला छान कोवळी पालवी येते, योग्य वेळी फुले फळे येतात ,त्याचप्रमाणे योग्य प्रकारे बस्ती घेतल्यास शरीरातील प्रजोत्पादन शक्ती, शरीरातील सर्व अवयावघटक यांचे सर्व क्रिया सुरळीत होतात.

*पावसाळ्यात नक्कीच सर्वांनी बस्ती कर्म करावे.

****************

संदर्भ:- च. चि.1/27-28, च. सि.1/29-31

***************

Vd Pratibha Bhave 

BAMS Ayu MD Obstetrics and Gynaecology 

8766740253

Ayurvedic Fertility Medicine - Fox Nut

मखान्न/मखाना Fox nut /Euryale ferox  मखान्नम् स्निग्ध वृष्यं च गर्भस्थापकं परम् l वातपित्त हरं बल्यं शीतं पित्तास्रदाह नुत् ll  आचार्य प्रिय...