निरोगी व्यक्तीला पंचकर्म करायचे झाल्यास
*नस्य
*#वमन केल्यावर 15 दिवसाने विरेचन करावे.
*#विरेचन केल्यावर 15दिवसाने निरुहबस्ति(काढया चा)
*निरुह बस्ति नंतर लगेच अनुवसान बस्ती(तेलाचा).
**************
मसाज करणे, स्टीम देणे हे पंचकर्माचे पूर्व तयारी आहे .
*नस्य म्हणजे नाकात औषध सोडणे.
*वमन म्हणजे उलट्या करवणे.
*विरेचन म्हणजे शौचास करवणे.
*बस्ती - औषधी गुद मार्गाने आत टाकणे
*रक्तामोक्षण म्हणजे शरीरातील रक्त बाहेर काढणे.
पंचकर्म करताना क्रम आवश्यक आहे.
वमन केल्यावर ,विरेचन केल्यावर ,बस्ती केल्यावर लगेच नस्य करणे हा विरूद्ध उपक्रम आहे.तसेच बस्ती नंतर विरेचन ,वमन-विरेचानानंतर वमन करणे हा विरुद्ध उपक्रम आहे त्यामुळे अनेक आजार होऊ शकतात.
पंचकर्मचिकित्सा घेतांना क्रम आवश्यकच आहे.
**************
एका व्यक्तीला संपूर्ण पंचकर्म करायला कमीत कमी #दीड महिना तरी द्यावा लागतो.
एक , दोन ,पाच दिवसात होणारे असे पंचकर्म नसते. तसेच ऋतु, वय,आजार हे बघून आवश्यकतेप्रमाणे नस्य,वमन,विरेचन,बस्ती यापैकी उपचार केले जातात.
***************
Vd Pratibha Bhave Pune
Ayurvedic Gynaecologist
8766740253
No comments:
Post a Comment