Tuesday, 10 August 2021

वर्षा ऋतू पावसाळ्यात रोग प्रतिकारशक्ती टिकवण्यासाठी

ह्या ऋतुत सर्वात महत्त्वाचे म्हणजे बस्ति घ्यावे. वर्षभरात साठलेले सर्व मल बस्ति ने निघून जातात. वायु नियंत्रणात येतो. त्यामुळे वर्षभर तब्येतीच्या तक्रारी निर्माण होत नाही 

1) आयुर्वेद शास्त्राप्रमाणे ह्या ऋतुमध्ये  पृथ्वी पासून निर्माण होणारी वाफ, पाऊस, व पाणी आंबट (अम्ल) गुणाचे होत असल्याने नैसर्गिक पणे शरिरातील पाचनशक्ति मंदावते. 

2) पचनशक्ति मंदावल्यामुळे वात पित्त व कफाचे आजार होण्याची, वाढण्याची शक्यता असते

3) म्हणून पावसाळ्यात पाचन शक्ती वाढवणाऱ्या आहार व औषधांचा उपयोग करावा 

4) विशेषतः बस्ती उपचार करुन घ्यावे 

5) बस्ती झाल्यावर, शरिर शुद्ध झाल्यावर जुन्या तांदुळा भातासोबत कुळीथ/मुग/चना/तुर ह्यांची रस्सेदार उसळ खावी 

6) मांसाहारी असल्यास गावरान कोंबडी/बकरा किंवा जंगली प्राण्यांच्या मांसरस/सूप किंवा पातळ रस्साभाजी जुन्या तांदळाच्या भातासोबत खावी 

7) उकळलेले पाणी प्यावे 

8) आंबट,खारट, गोड असे पदार्थ खावेत. परंतु पचायला हलके असे पदार्थ खावे

9) ह्या ऋतुत नदीचे पाणी पिऊ नये

10) दिवसा अजिबात झोपू नये

11) अधिक व्यायाम करु नये

12) हिंग्वाष्टक चुर्ण, दाडिमाष्टक चुर्ण,आमपाचक वटी, शंख वटी, अविपत्तिकर चुर्ण इत्यादी औषधांचा उपयोग आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावे. 

13) ऋतुनुसार आहारा विहारात बदल, बस्ती करुन घेतली तर आरोग्य टिकुन राहण्यास मदत होते.


Vd Pratibha Bhave

MD, BAMS

8766740253

त्रिभुवन किर्ती

ताप सर्दी साठी मेडीकल मध्ये जाऊन मनानेच इंग्रजी गोळ्या घेता का? मग त्याऐवजी त्रिभुवन किर्ती ही आयुर्वेदिक 1गोळी दिवसातून 3वेळा, 1चमचा आल्याचा रस व 1चमचा मधातून तीन दिवस घ्या. 

ताप असेल, अधिक प्रमाणात शिंका येत असतिल, हात, पाय, पाठ दुखत असतिल, चालले असता दुखणे वाढत असेल, थंडी वाटत असेल, गरम पदार्थ खावेसे वाटत असतिल, तोंडाची चव गेली असेल, कोरडा खोकला येत असेल, घसा दुखत असेल, पाणी पितांना सुद्धा त्रास होत असेल अशा वेळी त्रिभुवन किर्ती खूपच उपयोगी आहे.

कृत्रिम केमिकल्स शरीरात जाणार नाही ह्याची काळजी आपण स्वत:च घेतली पाहिजे. 


टीप - त्रिभुवन किर्ती लहान मुलांना देऊ नये. 


Vd Pratibha Bhave

Acidity

अॅसिडीटी झाली तर तुम्ही मेडीकल मध्ये जाऊन मनानेच इंग्रजी औषध घेता का?

 मग आयुर्वेदातील लघुसूतशेखर ची 1गोळी दिवसातून 3वेळा घ्या. 

*छातीत जळजळ, अर्धे डोके दुखणे, अर्ध शिशी, तोंडाला वारंवार फोड येत असतिल,वारंवार शौचास जावे लागणे ह्यापैकी कोणत्याही तक्रारींसाठी लघुसूतशेखर फारच उपयोगी आहे. 

*आंबवलेले, तिखट, शिळे पदार्थ, जसे ब्रेड, कढी, वडापाव, मिसळ, मांसाहार इत्यादी खाल्ल्यावर अॅसिडीटी होत असेल तर लघू सूतशेखर च्या गोळी ने आराम पडतो. कोणतेही केमिकल्स त्यात नाही त्यामुळे अतिशय निर्धोक असे औषध आहे. 

**टीप-कृत्रिम विषारी औषधे जेवढे टाळता येईल तेवढे टाळणे हे खूप महत्वाचे आहे. ******


Vd. Pratibha Bhave 

8766740253

पावसाळ्यात वारंवार द्रवमलप्रवृत्ती (loose motions). आयुर्वेदिक औषध

पावसाळ्यात पातळ शौचाला दिवसातून 5ते 6 वेळ होत असेल, पोट दुखत असेल, व आरोग्य तज्ञाकडून तपासणी न करता मेडीकल मधून  इंग्रजी औषध घेण्याची सवय असेल  तर ते न घेता आयुर्वेदिक सल्ला घ्या. 

1) संजीवनी वटी ही गोळी 2 ह्या प्रमाणात दिवसातून 6वेळा घ्या. असे तीन दिवस घ्यावी.

2) तसेच त्यासोबत

2 चिमूट शुंठी   2चिमूट ओवा व 2चिमूट सैंधव मीठ(rock salt) 1ग्लास पाण्यात टाकून कोमट करुन दिवसातून 3 वेळा प्यावे

3) उकळून गार केलेल्या पाण्यात मीठ साखर घालून लिंबू सरबत बनवून प्यावे.

4) उकळून गार केलेले पाणी प्यावे.

5) भूक लागली तर साळीच्या, राजगिऱ्या च्या लाह्या खाव्या. 

 ताजे  पातळ वरण व नरम भात खावा. 

6) 8ते 12 वर्षे वय असल्यास 1गोळी दिवसातून 6वेळा असे द्यावी

7) 5 ते 7वर्षे वय असेल तर अर्धी गोळी दिवसातून 6 वेळा हे प्रमाण योग्य आहे.

8) साधारणपणे तीन डोझ गेल्यावर शौचास जाण्याचे प्रमाण कमी होते. तसे न होता प्रमाण वाढले तर लगेच आरोग्य तज्ञाकडून तपासणी करुन घ्यावी

9) ह्या आजारात शरीरातील साखर मीठ पाणी झपाटय़ाने कमी होऊन जीव सुद्धा जायची शक्यता असते. त्यामुळे हे प्रमाण संतुलित राखणे  आवश्यक आहे. 

**महत्त्वाचे हे की Antibiotics न घेता सुद्धा तूम्ही बरे होऊ शकता.  मेडीकल मधुन विषारी औषध घेण्यापेक्षा अशा आजारात आयुर्वेद तज्ञांकडून उपचार करा. 


Vd. Pratibha Bhave 

8766740253 Pune

खर्जुरादी वटी -

रक्तस्राव, खाॅंसी, प्यास मे, करोना के बाद आने वाली कमजोरी मे गुणकारी

**********

  1. खारिक (छुहारा) 40gm
  2. मुनक्का 40
  3. जेष्ठमध 40gm
  4. खडीसाखर 40gm
  5. पिंपळी 20gm
  6. दालचिनी 20gm
  7. छोटी इलायची 20gm
  8. तेजपान 20gm

मुनक्का छोडकर सभी औषधीयॉं मिक्सर मे बारीक कर ले. छान ले. औषधी चुर्ण को मुनक्का के साथ मिलाकर मिक्सर मे बारीक कर ले. 

इस चुर्ण को प्लेट मे निकाल ले. इसमे थोडा  शहद मिलाकर मसूर दाने के आकार की छोटी गोली बना ले. सुखने के बाद काच की बरणी मे रख दे. Ref (बृ. नि. र.) 

मात्रा -1गोली दिनरात भर मे 6बार  मुंह मे रखकर चूसें

उपयोग - इससे प्यास,मूख सूकना,गर्मी, जलन, पित्त बढना, रक्तनिकलना, खाॅंसी,इसमे राहत मिलती हैl

-करोना होने के बाद शरीर मे बढी हुयी गर्मी को कम करने मे और शक्ती बढानेके लिए लाभदायक हैl

-स्रियोंमे रक्तप्रदर लाभदायक हैl

-बच्चे से बुढे तक को दे सकते हैl


Vd Pratibha Bhave 

BAMS MD

औषधी वनस्पती 'पुनर्नवा/खापरखुटी'.

1) पुनर्नवा ही पावसाळ्यात येत असल्याने वर्षाभू सुद्धा म्हणतात.  महाराष्ट्रात हिला घेंटुळी, खेडा भाजी सुद्धा म्हणतात. 

2) लाल व श्वेत असे दोन प्रकार असतात. लाल पुनर्नवा चे देठ फुले लाल असतात तर श्वेत पुनर्नवा चे देठ फुले पांढऱ्या रंगाची असतात. श्वेत पुनर्नवा उष्ण व रक्त पुनर्नवा शीत गुणाची आहे. 

3) ही औषधी शरीरात साठलेले अनावश्यक मलिन पदार्थ मलप्रवृत्ती, मुत्र प्रवृत्ती व घाम ह्या मार्गाने बाहेर काढते. 

4) तारुण्य टिकवण्यासाठी हे अतिशय महत्त्वाचे औषध आहे. शरीरात साठलेले विषारी पदार्थ बाहेर काढून रस, रक्त इत्यादी वाहिन्यांचा मार्ग मोकळा करते.  

4) हृदय, मुत्राशय(urinary bladder) , यकृत (liver),ग्रहणी(duodenum, jejunum , ileum), प्लिहा (spleen) शिर(brain), सिरा धमन्या (veins, arteries, neurons ), स्नायु (muscles, ligaments) इत्यादी अवयवांची शुद्धी करते. शरीरात साठलेले अतिरिक्त पाणी व चिकटपणा काढून टाकते. 

5) ही औषधी  वैद्यांच्या सल्ल्यानुसार रसायन पद्धतीने घेतली तर मधुमेह,सूज येणे,हृदय रोग, किडनी, मुत्राशयाचे आजार, पोटात वायु साठणे, दमा, इत्यादी आजार होत नाही. 

टीप : ह्या वनस्पती ची भाजी तुम्ही नक्कीच करत असाल. कशी करता ते  नक्की कळवा. 

संदर्भ - वैद्य गो. आ. फडके 


Vd Pratibha Bhave 

BAMS MD

 (Prasutitantra Streeroga)

PCOD/PCOS असणाऱ्यांनी पाळावयाचे आहाराचे नियम

PCOD, obesity, Diabetes ह्या आजाराने ग्रस्त असणाऱ्यांनी रोज च्या आहारात बार्ली  (यव/सत्तू) चा समावेश करावा. ह्याच्या पीठाचे पातळ सूप प्यावे. तसेच ज्वारीच्या पीठात मध्ये मिसळून भाकरी करुन खाव्या. तांदुळ, गहू, मैदा,साखर आहारात घेऊ नये.  तेल व मीठाचे प्रमाण जेवढे कमी करता येईल तेवढे बघावे. रोज एक तास उपाशीपोटी चालावे.

Vd Pratibha Bhave

BAMS MD Prasutitantra Streeroga

चातुर्मासाच्या निमित्ताने : 'आपले आरोग्य आपल्याच हातात आहे'

1) आजपासून चातुर्मासाला सुरवात झाली आहे. आषाढ शुद्ध एकदशी ते कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे चार महिने-श्रावण,भाद्रपद, आश्विन व कार्तिक. 

2) आरोग्याची विशेष काळजी घेण्याच्या दृष्टीने हे चार महिने विशेष महत्वाचे आहेत. 

3) ह्या महिन्यांत ऋतुचा परिणाम म्हणून शरीराची रोगप्रतिकारशक्ति, पाचन शक्ति कमी होते.

4) ढगाळ वातावरण व पाऊस ह्यामुळे जल व अन्न सुद्धा दूषित होते.

5) माशा, डास,किटक, साप, विंचू आदींचा प्रादुर्भाव वाढतो.

 6) वैदीक काळापासून चातुर्मासात उपवास, व्रत, यज्ञ, होम, हवन  केली जातात.

7) उपवास, व्रत ह्यामुळे मानसिक व शारीरिक स्वास्थ्य टिकून राहते. तसेच यज्ञ, होम, हवन, ह्यामुळे  वातावरणाची शुद्धी होते.  

8) आयुर्वेदानुसार ह्या चार महिन्यांत वर्षा  व शरद ऋतुचर्येचे पालन करावे. 

9) वर्षभर निरोगी राहण्यासाठी वर्षाऋतुमध्ये बस्ति व शरद ऋतुत विरेचन हे उपचार करुन घ्यावे. 


Vd. Pratibha Bhave 

BAMS, MD

( Prasutitantra Streeroga)

सुदृढ अपत्यप्राप्तीसाठी पुरुषाची जबाबदारी

1) सुदृढ बाळ होण्यासाठी स्रीऐवढेच पुरुष सुद्धा  जबाबदार  असतात. 

2) पुरुषांमध्ये निरनिराळी व्यसने ,जीवनशैलीत अनियमितपणा , मानसिक तणाव ह्या परिणाम म्हणून त्याच्या अपत्यांना , नातवंडांना जन्मजात शारीरिक आजार, मानसिक आजार, autism, लठ्ठपणा, असे अनेक आजार होऊ शकतात. 

3) उदाहरण द्यायचे तर, जर  पुरुष तंबाखू खात असेल /धुम्रपान करत असेल तर त्याचे शुक्राणूंवर (sperms) परिणाम होऊन पुढील पिढीमध्ये त्याचे परिणाम दिसू शकतात

Ref:-Dad’s Role in Baby’s Health Larger Than Thought?

By Matt McMillen

Medically Reviewed by Hansa D.

 Bhargava, MD on May 17, 2016

4) म्हणून सुदृढ अपत्यप्राप्ती साठी गर्भधारणा करण्याआधी   पुरुष ह्यांनी   योग्य जीवनशैली, नैसर्गिक आहार, रसायन औषधी, पंचकर्म करायला हवे. 

5) ह्यामुळे Oxidative stress कमी होतो, DNA repair होण्यास मदत होऊन अपत्यांमध्ये शारिरीक व मानसिक आजार निर्माण होण्याची शक्यता खूपच कमी होते. 

Vd Pratibha Bhave 

BAMS MD 

Prasutitantra Streeroga

रसायन चिकित्सा /immunity booster treatment

निरोगी, दीर्घ, मेधायुक्त, सुंदर आयुष्यासाठी

बाल्यावस्था संपल्यानंतर युवावस्थेत पंचकर्म करुन शुद्ध झाल्यावर रसायन चिकित्सा करावी. त्यामुळे स्मरणशक्ती, बुद्धी, आरोग्य, आयुष्य, सौंदर्य, प्रभा, स्वर, ज्ञानेंद्रिय व कर्मेन्द्रिय शक्ति, वाक् सिद्ध, शुक्रविपूलता, शरीरातील सर्व रसरक्तादी उत्तम प्रतीचे तयार होतात. 

तरुणांनी नियमितपणे नियमानुसार रसायन सेवन करावे. 

************

अनेक रसायन कल्पांपैकी एक सोपा कल्प:- 

-शतावरी कल्क कषाय सिद्ध ये सर्पिरश्नन्ति सिताद्वितीयम् l

ताञ् जीविताध्वानमभिप्रपन्नान्न विप्रलुम्पन्ति विकारचौराः llअं. ह्र. उ. 39/156

शतावरी वाटून घ्यावे तयार होणाऱ्या पिंडाला कल्क म्हणतात. तसेच शतावरी चा काढा करुन घ्यावा. हे दोन्ही तूपात शिजवले असता शतावरी घृत तयार होते. हे तूप खडीसाखर सोबत खाल्ले तर मनुष्याला जीवनरुपी रस्त्यावर चालतांना रोगरुपी चोर लूटू शकत नाही. म्हणजे तो आजारी पडत नाही. 

टीप:-रसायन सेवन नेहमीच शरीरशुद्धी केल्यावरच व तज्ञांच्या मार्गदर्शनानुसार घ्यावे असा शास्त्राचा नियम आहे,अन्यथा रोग उत्पन्न होतात. 

Vd Pratibha Bhave 

BAMS MD Prasutitantra Streeroga

पोटाच्या तक्रारींसाठी शिवाक्षार पाचन चुर्ण

"शिवाक्षार पाचन चुर्ण"  

1) थोडेसे खाल्ले तरी पोट फुगणे,जड होणे

2) वारंवार अजीर्ण होणे, उलट्या होणे

3) लिव्हर चे कार्य बिघडणे

4) अम्लपित्त 

5) पोट साफ न होणे, बद्धकोष्ठता 

6) वायू साठल्याप्रमाणे वाटणे

7) उचक्या लागणे

8) जेवणात रुची न वाटणे

9) पोट दुखणे

10) वारंवार जंत होणे

11) मलप्रवृत्ति अतिशय दुर्गंधी युक्त असणे

अशा तक्रारींसाठी शिवाक्षार पाचन चुर्णाचा चांगला फायदा होतो. 

12) लिव्हर (यकृत ) ची ताकत वाढवणारे अतिशय उत्तम, गुणकारी चूर्ण आहे 


मात्रा - अर्धा चमचा चुर्ण (2-3gm), दिवसातून दोनदा, जेवणानंतर, अर्धा कप कोमट पाण्यात मिसळून प्यावे


टीप- आयुर्वेदिक तज्ञांच्या मार्गदर्शने घ्यावे

Vd Pratibha Bhave 

BAMS MD 

Prasutitantra Streeroga

PCOD (Polycystic ovarian syndrome) म्हणजे काय? त्यावर उपाय.

1) साधारणपणे पाळीची सुरवात झाल्यावर दर महिन्याला बीजग्रंथी मध्ये बीज योग्य आकाराचे तयार होणे व बाहेर पडणे  हे आवश्यक आहे. तसे न होता ते पूर्ण वाढत नाही व बीजग्रंथी मध्येच साठून राहतात. 

सोनोग्राफी केल्यावर ती साठलेली सर्व बीजे एक मोत्याची माळ असल्याप्रमाणे दिसतात. तसेच रक्तात मुख्यतः Aldosterone व insulin चे प्रमाण वाढते. चेहऱ्यावर पोटावर छातीवर, केस येऊ लागतात, डोक्याची केस कमी होतात, अशी हार्मोन्स असंतुलना ची लक्षणे निर्माण होतात. ह्यालाच  PCOD/PCOS म्हणतात 

2) PCOD/PCOS हे एका दिवसात घडणारा आजार नव्हे. असे घडायला मुख्य कारण वजन वाढणे व व्यायामाचा अभाव हे आहे. कधी कधी वंशपरंपरेने सुद्धा दिसूनयेतो.  कधी कधी बारीक (कृश) स्त्रियांमध्ये सुद्धा PCOD आढळतो. 

3) शरीराचे वजन वाढले म्हणजे शरीरातील प्रत्येक घटकांमध्ये प्राकृत काम करण्याच्या प्रक्रियेत बिघाड व्हायला सुरुवात होते, जसे पाळी मध्ये बदल, गर्भधारणा न होणे, गर्भिणी अवस्थेत साखर वाढणे, रक्तदाब वाढणे, चालतांना दम लागणे, वारंवार सर्दी होणे, सारखी भूक लागणे, घोरणे, उत्साह कमी होणे, अतिशय घाम येणे, डोके दुखणे, त्वचेचा वर्ण काळपट होणे, लघवीच्या तक्रारी, अम्लपित्त अशी अनेक लक्षणे निर्माण होतात 

4) आयुर्वेदामध्ये रोगाच्या  कारणानुसार उपचार केले जातात.

5) PCOD /PCOS मध्ये रस, रक्त, मांस, मेद हे दुषित होतात त्यांना स्वच्छ करण्यासाठी औषध द्यावी लागतात. 

6) तसेच शरीरात छोट्या छोट्या घटकांना पोषक तत्व पुरवण्यामध्ये  'क्लेद' हा पदार्थ अडथळा करत असतो, तो दूर करण्यासाठी औषधे दिली जातात, वमन, विरेचन केले जाते. 

7) बीज वेळेत फुटणे, पाळी वेळेवर येणे, हे कार्य अपान वायुचे आहे ते कार्य बिघडलेले असते. ते ठीक करण्यासाठी  औषधे, बस्ति दिल्या जातात 

8) बीज चांगल्या प्रतिचे तयार होणे हे सुद्धा महत्त्वाचे आहे. त्यासाठी औषध, पंचकर्म हे उपचार केले जातात 

9) वजन कमी करणे, पथ्यापथ्य, दिनचर्ये चे पालन करणे, आवश्यकतेनुसार औषध व पंचकर्म  केल्याने PCOD/PCOS आयुर्वेदाने पूर्ण बरा होतो. 

10) साधारणपणे पुष्पधन्वारस, लघुमालिनी वसंत, महायोगगुग्गुळ, चंद्रप्रभा वटी, दशमुलारीष्ट, च्यवनप्राश, वसंतकुसूमाकर, फलघृत, गोक्षुर, पुनर्नवा, कांचनार, लताकरंज, कुमारी आसव अशी अनेक औषधी रुग्णाचे वय, दोष, दुष्य, बल, काल, प्रकृति इत्यादींचा विचार करुन दिली जातात 

Vd Pratibha Bhave 

BAMS MD (Prasutitantra Streeroga)

Importance of breast Milk according to the Ayurveda

1)It is very important to get sufficient breast milk to every child. 

2) Breast milk provides Physical and psychological benefits to both mother and baby. 

3)Good Quality of breast Milk- 
अव्याहतबलाङ्गायुररोगो वर्धते सुखम्l
शिशुधात्र्योरनापत्तिः शुद्धक्षीरस्य लक्षणम् ll 
का. सं. सू. 19/26 

Good Quality of breast Milk is that which provides unobstructed, good strength, growth of all body parts,longevity and good health to the child and does not cause any trouble to the child and wet- nurse (धात्री). 

4)Getting proper good quality breast milk to the baby is dependent on nutrition of mother during pregnancy and after delivery. 

5)Formation of Breast Milk (स्तन्य) :- 
रसप्रसादो मधुरः पक्वाहारनिमित्तज:l 
 कृत्स्नदेहात् स्तनौप्राप्तःस्तन्यमित्यभिधीयते ll
सु. सं. नि. 10/18 

After digestion of food the 'Rasa' is formed. Sweet essence part of this Rasa circulating through entire body, reaches breast and it is called as Stanya(स्तन्य) /breast milk. 

 Vd Pratibha Bhave 
 BAMS MD 
 Prasutitantra Streeroga

Ayurvedic Fertility Medicine - Fox Nut

मखान्न/मखाना Fox nut /Euryale ferox  मखान्नम् स्निग्ध वृष्यं च गर्भस्थापकं परम् l वातपित्त हरं बल्यं शीतं पित्तास्रदाह नुत् ll  आचार्य प्रिय...