1) पुनर्नवा ही पावसाळ्यात येत असल्याने वर्षाभू सुद्धा म्हणतात. महाराष्ट्रात हिला घेंटुळी, खेडा भाजी सुद्धा म्हणतात.
2) लाल व श्वेत असे दोन प्रकार असतात. लाल पुनर्नवा चे देठ फुले लाल असतात तर श्वेत पुनर्नवा चे देठ फुले पांढऱ्या रंगाची असतात. श्वेत पुनर्नवा उष्ण व रक्त पुनर्नवा शीत गुणाची आहे.
3) ही औषधी शरीरात साठलेले अनावश्यक मलिन पदार्थ मलप्रवृत्ती, मुत्र प्रवृत्ती व घाम ह्या मार्गाने बाहेर काढते.
4) तारुण्य टिकवण्यासाठी हे अतिशय महत्त्वाचे औषध आहे. शरीरात साठलेले विषारी पदार्थ बाहेर काढून रस, रक्त इत्यादी वाहिन्यांचा मार्ग मोकळा करते.
4) हृदय, मुत्राशय(urinary bladder) , यकृत (liver),ग्रहणी(duodenum, jejunum , ileum), प्लिहा (spleen) शिर(brain), सिरा धमन्या (veins, arteries, neurons ), स्नायु (muscles, ligaments) इत्यादी अवयवांची शुद्धी करते. शरीरात साठलेले अतिरिक्त पाणी व चिकटपणा काढून टाकते.
5) ही औषधी वैद्यांच्या सल्ल्यानुसार रसायन पद्धतीने घेतली तर मधुमेह,सूज येणे,हृदय रोग, किडनी, मुत्राशयाचे आजार, पोटात वायु साठणे, दमा, इत्यादी आजार होत नाही.
टीप : ह्या वनस्पती ची भाजी तुम्ही नक्कीच करत असाल. कशी करता ते नक्की कळवा.
संदर्भ - वैद्य गो. आ. फडके
Vd Pratibha Bhave
BAMS MD
(Prasutitantra Streeroga)
No comments:
Post a Comment