1) आजपासून चातुर्मासाला सुरवात झाली आहे. आषाढ शुद्ध एकदशी ते कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे चार महिने-श्रावण,भाद्रपद, आश्विन व कार्तिक.
2) आरोग्याची विशेष काळजी घेण्याच्या दृष्टीने हे चार महिने विशेष महत्वाचे आहेत.
3) ह्या महिन्यांत ऋतुचा परिणाम म्हणून शरीराची रोगप्रतिकारशक्ति, पाचन शक्ति कमी होते.
4) ढगाळ वातावरण व पाऊस ह्यामुळे जल व अन्न सुद्धा दूषित होते.
5) माशा, डास,किटक, साप, विंचू आदींचा प्रादुर्भाव वाढतो.
6) वैदीक काळापासून चातुर्मासात उपवास, व्रत, यज्ञ, होम, हवन केली जातात.
7) उपवास, व्रत ह्यामुळे मानसिक व शारीरिक स्वास्थ्य टिकून राहते. तसेच यज्ञ, होम, हवन, ह्यामुळे वातावरणाची शुद्धी होते.
8) आयुर्वेदानुसार ह्या चार महिन्यांत वर्षा व शरद ऋतुचर्येचे पालन करावे.
9) वर्षभर निरोगी राहण्यासाठी वर्षाऋतुमध्ये बस्ति व शरद ऋतुत विरेचन हे उपचार करुन घ्यावे.
Vd. Pratibha Bhave
BAMS, MD
( Prasutitantra Streeroga)
No comments:
Post a Comment