Tuesday, 2 May 2023

तारुण्यपण टिकवण्यासाठी - रसायन चिकित्सा


  • ह्यासाठी रसायन चिकित्सा  करावी
  • आयुर्वेदात  रसायन चिकित्सा ला खूप महत्व आहे.
  • जे औषध वृद्धावस्था व रोग नष्ट करतो त्याला रसायन म्हणतात.

यज्जराव्याधिविध्वंसि भेषजं तद्रसायनम् ll


रसायन चिकित्सा करण्याचे वय:-

  • तरुण  अवस्थेच्या प्रारंभी 
  •  तरुण अवस्थेच्या मध्यात 
  • म्हणजे वय 16 ते वय 45 ह्या कालावधीत रसायन चिकित्सा करावी


वमन, विरेचन, बस्ति इत्यादी पंचकर्मा ने शरीरशुद्ध झाल्यावर रसायन चिकित्सा करावी लागते.

ज्याप्रमणे मळलेलया कपड्याला रंग दिला तर तो नीट बसत नाही त्याचप्रमाणे शरीरशुद्धी केल्याशिवाय रसायन औषधी उपयोगी होत नाही.

***रसायन चिकित्सा केल्याने हल्ली खूप प्रमाणात आढळणारा # PCOD, fatigue #Abnormal Sperms,#Metabolic syndrome,#Psycological crises असे अनेक आजार नियंत्रणात येतात 


Vd. Pratibha Bhave ,Pune

बाळांच्या आरोग्यासाठी

  • बाळ पुर्ण 6महिन्याचे. बाळाला सुवर्ण बिंदू प्राशन करण्यासाठी आमच्या रुग्णालयात आली. बाळाचे वजन केले.4.5किलो होते. बाळाचे वजन कमी आहे असे मी सांगितल्यावर चिंतातुर झाली. 
  • त्याचे वजन कसे भरुन काढायचे ह्यासाठी अनेक प्रश्नांचा भडीमार सुरु झाला.
  • तिने सात दिवसापूर्वीच वरणाचे पाणी, भाताची पेज इत्यादी सुरू केले होते.ती बाळाला अंगावरचे  दूध पाजत होती.वरचे दूध सुरु केले होते . ती बाळाच्या आरोग्यासाठी अतिशय प्रयत्नशील होती.
  • 2वर्षे अंगावर पाजायचे आहे व तिच्या आरोग्यावर बाळाचे आरोग्य अवलंबून आहे हे तिला माहितच नव्हते. तपासणी केल्यावर ,अंगावरील दुधाचे प्रमाण, घट्टपणा कमी झाला आहे हे लक्षात आले. त्यामुळे बाळाच्या वाढीवर परिणाम झाला असे आम्ही सांगितले.
  • आयुर्वेदात आई दूध वाढवण्यासाठी अनेक औषधी आहेत.
  • आयुर्वेदात 2वर्षांपर्यंतच्या व आई चे दूध पिणाऱ्या बाळाच्या आरोग्यासाठी  बाळावर औषधांचा भडीमार करण्यापेक्षा दूध पाजणाऱ्या आईला औषध देण्यावर  भर दिलेला आहे. ह्या पद्धतीमुळे  बाळाला कुठलाही अपाय न होता आजारांचा निर्धोकपणे उपाय होतो.
  • वरील बाळाच्या  आईला विदारीकंद, अश्वगंधा व शतावरी ह्या औषधी दुधात शिजवून पिण्यासाठी दिले. 15दिवसात बाळाचे वजन 5.8 किलो झाले. 
  • आई चे दूध बाळाला मिळणे हा त्याचा नैसर्गिक हक्क आहे. तो त्याला मिळावा म्हणून मातेने नेहमीच प्रयत्नशील रहावे. हे प्रयत्नपूर्वक केल्यास बाळाचे शारीरिक व मानसिक आरोग्य अबाधित राहते.


Vd Pratibha Bhave,Pune

8766740253

डोळ्यांच्या आरोग्यासाठी

  1.  उन्हाळ्यात डोळ्यांची काळजी विशेषतः घ्यावी लागते.
  2. आयुर्वेदानुसार डोळे हे आलोचक पित्ताचे स्थान आहे. 
  3. उन्हाळ्यात उष्ण, कोरडी,हवा असते . त्यामुळे डोळे कोरडे पडणे, आग होणे, खाजवणे, लाल होणे, पाणी येणे अशा अनेक तक्रारी निर्माण होतात.
  4. अशा तक्रारी निर्माण झाल्यावर औषध घेण्यापेक्षा डोळे थंड राहतील, कोरडेपणा निर्माण होणार नाही ह्यासाठी प्रयत्नशील असावे .
  5. तसेच शरीरातील साखर मीठ पाण्याचे संतुलन राखण्यासाठी सरबत,रस,पातळ पेय प्यावी. उन्हापासून संरक्षण करावे.
  6. आयुर्वेदिक वैद्यकीय सल्ल्याने डोळ्यांमध्ये नियमितपणे नेत्रबिंदू घालावे. 
  7. आम्ही लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत  सर्वांना उन्हाळयात हे नेत्राबिंदू देतो.
  8. ह्यामुळे डोळ्यांवर ताण येत नाही, कोरडेपणा लगेच कमी होतो,आग होणे, पाणी येणे, खाजवणे, ह्या तक्रारीं पासून सुटका होते.


Vd Pratibha Bhave, Pune

Sukhkarta Ayurvedic Panchkarma clinic,Pune

8766740253

Tuesday, 21 March 2023

हृदयासाठी (For Heart)

'हृदय'आजारी  होऊ नये ह्यासाठी आयुर्वेदाने आतिशय संक्षिप्तपणे उपाय सांगितले आहेत. 

काळ बदलला तरी ते जशीच्या तशी लागू होतात.


1) मानसिक दु:खापासून स्वतः चे रक्षण करावे

2) हृदयाला बल देणारे ,ओजोवर्धक असे औषध, आहार  व दिनचर्या असावी.

3) शरीरातील सर्व मार्ग स्वच्छ करणारा आहार, औषध व दिनचर्या असावी.

4)शांती व ज्ञान मिळवण्यासाठी प्रयत्नशिल असावे.


संदर्भ-.... परिहार्या विशेषण मनसो दुःख हेतव: l l

हृदयम् ……..ll चरक सुत्रस्थान 30/13-14

हृदयाची गती थांबली की आयुष्य थांबते म्हणून हृदयाचे रक्षण करण्यासाठी  प्रयत्नशील असावे. 


Vd Pratibha Bhave

BAMS,MD,Ayu

Obstetrics and Gynaecology

8766740253

Ovaries मध्ये तयार होणाऱ्या ग्रंथी (Cysts)

 Ovaries मध्ये तयार होणाऱ्या ग्रंथी (Cysts)

—----------------------------------------------

गर्भाशयाच्या दोन्ही बाजूला एक एक डिंबग्रंथी (Ovary) असते.

  • वयाच्या 12 ते15व्या वर्षापासून  ह्या ovaries मधून -दर महिन्याला साधारणपणे 1 बीज तयार होत  असते व ते बीज बिजकोषातून गर्भधारणेसाठी बाहेर पडते. -बीज बाहेर पडल्यावर बिजकोष संकुचित होते .
  • बीज तयार झाल्यावर  कधी कधी ते बाहेर न पडता बीजकोषात पडून राहते व मोठी द्रवपदार्थ भरलेली ग्रंथी तयार होते(follicular cysts)
  • किंवा कधीकधी बीज बाहेर पडल्यावर  बीजकोष संकुचित होत नाही व ते द्रव स्त्रावा ने भरते.(Corpus luteum cyst)
  • ह्या सर्व प्रकारच्या ग्रंथी आकाराने कमी जास्त होत राहतात, जातात. ह्यांना Functional cyst असे म्हणतात 
  • मात्र कधी कधी बीजाची वाढ खुंटते व छोट्या छोट्या अनेक ग्रंथी तयार होतात.ह्याला PCOD म्हणतात अशावेळी उपचाराची गरज असते.
  • याशिवाय अश्याही काही ग्रंथी तयार होतात ज्या आपोआप जात नाही . मोठ्या झाल्या तर त्रास होतो.त्या औषधाने जात नाही . सर्जरी ने काढावे लागते.. त्यांना non-functional cyst म्हणतात .


*************

Vd Pratibha Bhave,

सारस्वतारिष्ट (सुवर्ण युक्त)

 "#सारस्वतारिष्ट (#सुवर्ण युक्त)"

  हे औषध परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांनी नक्की घ्यावे

***********

  • हया औषधाने परीक्षेच्या काळात अभ्यास, जागरण ह्यामुळे डोळ्यांवर येणारा ताण दूर होतो. 
  • हृदय,मनावर येणारे दडपण जाऊन हलकेपणा येतो. *पचनाच्या तक्रारी , डोके दुखणे,पित्त वाढते हया तक्रारी बऱ्या होतात. 
  • विचारांचा गोंधळ उडणे, विसरायला होणे, एकाग्रता नसणे, चक्कर आल्यासारखे वाटणे अशी लक्षणे असतील तर ह्या औषधाने लगेच कमी होतात. 
  • हया औषधाने मनाला प्रसन्नता व बुद्धीला तरतरितपणा येतो. स्मरणशक्ती सुधारते. 
  • लहान मुलांना दूधातून नियमीतपणे काही दिवस दिल्यास उच्चार स्पष्टता,उत्तम नेत्रशक्ती, तीव्र बुद्धी व #स्मरणशक्ती निर्माण होते 

**************

Vd Pratibha Bhave Sukhkarta Ayurvedic Panchkarma clinic,Pune 8766740253

चणा/चणक/हरभरा

  • होलिकेका नैवद्यासाठी पुरणाची पोळी करण्याची प्रथा आहे
  • पुरणाची पोळी करण्यासाठी चण्याची डाळ ( हरभरा डाळ) वापरली जाते.
  • आयुर्वेद मते चणक थंड गुणाची आहे.
  • तसेच शरिरातील पित्त व कफ कमी करते
  • रक्तातील उष्णता कमी करते
  • पचायला हलकी असली तरी अधोवायु मल प्रवृत्तीला अवरोध करते. त्यामुळे हरभरा डाळीचे पदार्थ खाल्ल्यावर पोटात वायू होतो . शौचास साफ होत नाही.
  • हे टाळण्यासाठी डाळीचे पदार्थ भरपूर तुपात बनवावे 
  • पुरणपोळी  भरपूर तुप घालून खाल्ली तर पोट फुगणे,पोट दुखणे ह्या तक्रारी होत नाही.   
  • डाळ शरीरातील मेद कमी करणारे आहे  (fat, cholesterol) .
  • उन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी गुळ फुटाणे,तूप लावून पुरणपोळ्या, डाळीचे सूप, कढण घेणे हे आरोग्य टिकवायला मदत करणारे आहे.
  • मग आज आरोग्यासाठी पुरणपोळी खायलाच हवी.
  • डायबेटिस असणाऱ्या रुग्णांनी गोड न घालता पुरण पोळी  साजूक तुपात सोबत खावी.

**तेलात तळलेले बेसनाचे भजी करण्यापेक्षा डाळ भिजत घालून वाटून कढीपत्ता,खोबरे,कोथिंबीर , किंचित जिरे ओवा,मिरे,मीठ ,हळद, छोटे छोटे वडे तुपात तळून खावे .ह्याने पित्त होत .नाही. **************

Vd Pratibha Bhave,Pune

8766740253

Regimen of diet according to Ayurveda (भोजन करण्याचे आयुर्वेदोक्त नियम)

1) काले – Food should be taken at the proper time, 2)   सात्म्ये-food should be familial, acceptable  3) शुचि – it should be clean 4) हितं -...