Friday, 9 February 2024

गर्भधारणेसाठी आयुर्वेदिक उपचार (Ayurvedic Treatment in #Infertility)

विश्रांतवाडी पुणे येथील रुग्णा जुलै 2021 मध्ये गर्भ धारणा होत नाही म्हणून उपचारासाठी आमच्या क्लिनिक मध्ये आली.

*लग्नाला 3वर्षे झाली होती. वय 33वर्षे. आयटी मध्ये नोकरीला.

*1वर्षापासून INFRTILITY CENTRE मध्ये उपचार सुरु होते.

*तेथे IUI 3वेळा झाले होते पण गुण आला नाही. आता त्यांना IVF (test tube baby) करावे असे तेथील डॉक्टरांनी सांगितले.

* IUI च्या वेळी injunctions चा त्रास झाला म्हणून रुग्णा आमच्याकडे आली.

—----तपासणीत असे दिसून आले की,--------

*रुग्णाची पाळी 25ते 26दिवसात येत होती.

*जुन्या सोनोग्राफी रिपोर्ट्स मध्ये असे आढळले की त्यांचे folicals पूर्ण वाढ होण्याआधीच फुटतात.साधारणपणे 15 ते 16mm size. त्यामुळे endometrium सुद्धा चांगले तयार होत नव्हते.

*TB PCR endometrium negative होते.

*त्यांच्या पतीचे sperms फक्त 3%normal होते व 97% abnormal होते.

**दोघांनाही उपचाराची गरज आहे असे मी सांगितले. 

लाइफ स्टाइल,आहार ह्यात बदल केला.

**मिस्टरांचे विरेचन व बस्ति केली. 

**रुग्णाला बस्ती व उत्तरबस्ति केले.

**दोघांनाही रक्तशुद्धी करणारी, बीज सुधारणारे औषध दिली.

**हळूहळू पाळीत सुधारणा झाली. 

**जानेवारी 2022मध्ये गर्भधारणा झाली.

**17आठवड्यात ओटीपोटात ओढ बसत असल्याने,  

Sonography मध्ये गर्भाशय ग्रीवा फक्त 2.5cm आढळली,short cervix मुळे गर्भपाताची शक्यता किंवा पुर्ण दिवस न भरता प्रसूती होईल असे वाटले . असे घडू नये म्हणून  #cervical cerclage केले. 

***गर्भिणी अवस्थेत 9महिने आमची औषधी घेतली व तपासण्या व्यवस्थित केल्या. पोटात दुखायला लागले तेव्हा cerclage केलेला टाका काढून टाकला . छान कळा येऊन प्रसूती झाली.

**ऑक्टोबर 2022ला पूर्ण दिवसांचे 3450 gm वजनाचे गुटगुटीत बाळ जन्माला आले.

*बाळ बाळंतीण सुखरुप आहेत.**

#आयुर्वेद व आधुनिक विज्ञानाची कृपा.


Vd Pratibha Bhave ,

 Ayurvedic Gynaecologist 

Sukhkarta Ayurvedic Panchakarma Clinic Pune 8766748253

प्रयत्नांती परमेश्वर

* जून 2021 ला मुंबई वरुन पुण्याला आमच्याकडे उपचारासाठी एक रुग्णा आली. 

*वय 35 वर्षे.

*लग्नाला 7 वर्षे होऊन सुद्धा बाळ नव्हते. 

*त्या स्वतः M.D. आयुर्वेद होत्या.

* आधी 3वेळा गर्भ धारणा झाली, परंतु गर्भपात झाला होता.

*पहिला गर्भपात 7आठवडे ,दुसरा 8 आठवडे  , सोनोग्राफी मध्ये बाळाचे ठोके सुरू झाले होते परंतु नंतर रक्तस्त्राव सुरु झाला म्हणून D&C करावे लागले.

*तिसऱ्या वेळी गर्भ राहिला पण त्यात fetal pole नव्हते त्यामुळे तो सुद्धा काढावा लागला.


असा सर्व इतिहास त्या रुग्णाने सांगितला.

** त्यांची पाळी व्यवस्थित येत होती, इतर कुठलाच आजार नव्हता. Infection नव्हते.मिस्टरांचा semen analysis नॉर्मल होते.

** रुग्णाचा AMH हे 0.8 ng/ml असे होते. म्हणजे नॉर्मल पेक्षा कमी असल्यामुळे गर्भपात होतो , म्हणून डोनर घेऊन IVF हा एकच उपाय आहे असे इतर डॉक्टर्स चे मत होते .

***शेवटचा उपाय म्हणून त्या मोठया आशेने आल्या होत्या. विशेष म्हणजे मुंबईत पंचकर्म झाले होते पण गुण आला नाही असे त्या म्हणाल्या.

**पुण्यात आमच्या क्लिनिक मध्ये शास्त्रोक्त पद्धतीने पंचकर्म, #उत्तरबस्ति केले. 

***3 महिने व्यवस्थितपणे औषधी घेतल्यावर गर्भ ठेवायचा असे ठरले. त्याप्रमाणे ऑक्टोबर-2021 मध्ये गर्भधारणा झाली.गर्भिणी अवस्थेत 9 महिने आमची आयुर्वेदिक औषधे सुरु होती.

पुर्ण दिवसाचे स्वस्थ सुंदर 3250gms चे पुत्ररत्न जन्माला आले. गुण आला.

बाळ बाळंतीण सुखरुप आहेत.


Vd Pratibha Bhave

Ayurvedic Gynaecologist,

Sukhkarta Ayurvedic Panchakarma Clinic Pune 8766740253

तुम्ही मांसाहारी आहात? मग जाणून घ्या.

मज्जा  ( #bone marrow)  चे आयुर्वेद शास्त्रानुसार गुण व त्याचा शरीरासाठी उपयोग:-

*************

  • आहार,औषध, बस्ती रुपात मज्जा उपयोगी आहे. मज्जा  शरीरात कफ, मेद (fat), रस, मज्जा ताकद, बल, वीर्य वाढवतो
  • विशेषतः हाडे मजबूत करतो.
  • संपुर्ण शरीर स्निग्ध करतो.

***पण मज्जा कुणी खावी ह्याचे नियम आहेत.

विशेषत: 

  •  ज्याला कडकडून भूक लागते.
  • जो सतत शारीरिक कष्टाची कामे करतो
  •  उन्हात काम करणारे ,नेहमीच स्नेहपदार्थ खाणारे
  • ज्याला वात रोग आहेत
  • तसेच ज्यांना नेहमीच शौचाला कठीण होते, क्रूरकोष्ठी आहेत ह्यांनी मज्जा ह्या प्राणिज पदार्थाचा आहारात समावेश करता येतो.
  • #आयुर्वेद मते सर्व स्निग्ध पदार्थ हे प्राणिज व वनस्पति जन्य आहेत .

आयुर्वेदात ह्याचे मुख्यतः 4प्रकार केले आहेत.

1) घृत( ghreet )

2) तेल (oil) 

3) वसा (animal fat) 

4) मज्जा(bone marrow) 

 हे सर्व स्निग्ध पदार्थांत हे 4 प्रकार उत्तम आहेत कारण कोणतेही पदार्थ ह्या स्निग्ध पदार्थांमध्ये मिसळले की त्यांचे गुणधर्म ह्या स्निग्ध पदार्थात उतरतात . 


संदर्भ- चरक सूत्र 13/13 

**ह्या चार स्निग्ध पदार्थांमध्ये  घृत सर्वात श्रेष्ठ व त्यामानाने क्रमाने तेल,वसा, मज्जा कमी गुणवान आहेत.

**हे स्निग्ध पदार्थ औषधी स्वरुपात पोटात घेणे,मालिश, नस्य, बस्ति, साठी उपयोगी आहेत.


Vd Pratibha Bhave Pune,8766740253

गर्भाशय व मानसिक स्वास्थ

1) गर्भाशयाचा व मानसिक भावनांचा अतिशय जवळचा संबंध आहे. 

2) अत्याधिक मानसिक ताण व चिंता ह्यांचा गर्भाशय व हृदय ह्या दोन्ही अवयवांवर परीणाम होतो .

हृदयातील भावना गर्भाशयात पोहचत असतात.

 3) आयुर्वेदात चिंता, भय ह्यामुळे रसदुष्टी होते असे म्हटले आहे . रसदुष्टि हे हृदयाचे आजार  गर्भाशयाचे, पाळीच्या आजारांचे कारण आहे.

4) Chinese internal medicine मध्ये ह्यालाच  'Bao Mai' म्हणतात .

5) स्त्री ची मानसिक अवस्था ठीक नसेल तर पाळीमध्ये अनेक तक्रारी निर्माण होतात, गर्भाशयात गाठी तयार होतात,गर्भ धारणा होत नाही, वारंवार गर्भपात होतो.

6) मानसिक स्वास्थ उत्तम असेल तर मासिक पाळी नियमित होते व गर्भ राहण्यासाठी अडचण येत नाही.

7) सद्ध्या लोकांना मनाने मोकळे होता येत नाही. सतत तणावाखाली वावरतात असतात. अल्कोहोल, स्मोकिंग, इतर व्यसने वाढली आहेत.ताण कमी करण्यासाठी पाळीव प्राणी सुद्धा घरात ठेवतात. परंतु ह्या कशाचाही उपयोग होत नाही.

 8) गर्भाशयाचे तसेच हृदयाचे काम व्यवस्थितपणे होण्यासाठी नियमीतपणे व्यायाम, योग, प्राणायाम ,समाजात वावरणे, सणासुदीला मनोरंजनासाठी एकत्र येणे, दिनचर्या, आहाराचे नियम पाळणे, गरजेनुसार औषधे,पंचकर्म, acupuncture करणे आवश्यक आहे 

* मानसिक आरोग्य मिळवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असावे.***


Vd Pratibha Bhave ,Pune

8766740253

तुरट चवीचे पदार्थ

  • साधारणपणे तुरट चवीचे पदार्थ थंड , पचायला थोडे हलके, कोरडेपणा आणणारे, रुक्ष गुणाचे असतात
  • जखमांना वरुन लावले तर त्या लवकर भरुन येतात
  • कफ शोषून घेतात, रक्तस्त्राव थांबवतात


***तुरट पदार्थ अधिक प्रमाणात खाल्ल्यास

  • हृदयात जडपणा येतो
  • पोटात वायू साठतो. बद्धकोष्ठता होते .
  • वात, मूत्र , शुक्र प्रवृत्ती ला अडथळा येतो
  • शरीरातील रस रक्तादी वाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो
  • शरीराला काळपटपणा  येतो, तहान लागते 
  • शरीराचे वजन कमी होऊन कृशता येते
  • * प्रजनन क्षमता कमी होते
  • * पक्षवध (paralysis), अर्दित (facial palsy) , इत्यादी वातरोग होतात.


संदर्भ - च.सू.26

तुरट पदार्थ :- जसे सुपारी, काथ, कच्ची फळे जसे केळी, कच्चा पेरू, कच्ची जांभूळ, हिरवी भोकर इत्यादी


Vd Pratibha Bhave Pune

8766740253

आंबट पदार्थ

  • साधारणपणे आंबट पदार्थ पचायला हलके, उष्ण गुणाचे व स्निग्ध असतात.
  • आंबट पदार्थाने भोजनाला रुची येते
  • आंबट पदार्थ मनाला तृप्त करतात, 
  • अन्नाचे पचन करतात, अधोमार्गाने वात बाहेर काढतात.
  • शरीर शक्ती वाढवतात , इंद्रिय दृढ करतात, ह्रदयाला तृप्त करतात
  • मुखात लालास्त्राव वाढवतात, भोजनाला ओलसरपणा आणतात,तसेच अन्नाचे पचन होताना आतड्याची गती वाढवतात

****

परंतु अत्याधिक प्रमाणात खाल्ले 

  • तर दात शिवशिवतात, आंबतात 
  • पित्त वाढते,खूप तहान लागते, रक्त दूषित होते, अंगाला सूज येऊ लागते(inflammatory)
  • अंगावर किंवा शरीरात जखम असेल, हाड मोडले असेल, अंगावर सूज असेल अशा व्यक्तीने आंबट पदार्थ खाल्ले तर पूय (pus formation) निर्मिती होते
  • कंठ, छाती व हृदयाच्या ठिकाणी जळजळ होते.

आंबट पदार्थ - दही, व्हिनेगर,  चिंचा, कैरी, डोंगरी आवळा, न पिकलेली द्राक्षे, करवंद,आंबट बोरे संत्री इत्यादि 

 

सन्दर्भ - चरक सूत्रस्थान 26/43

Vd Pratibha Bhave,Pune 8766740253

खारट पदार्थ

खारट पदार्थ शरीरात ओलसरपणा निर्माण करतात. अवयव मृदु करतात .तीक्ष्ण गुणाचे असतात. आहाराला रुची आणतात.गुणाने जरा स्निग्ध, थोडे उष्ण, व पचायला थोडे जड असतात.

1) योग्य प्रमाणात व योग्य स्वरूप घेतले तर भूक वाढवतात, 

2) शरीरात साठलेले दोष ,मल  पातळ करुन , मार्ग मोकळा करून बाहेर काढतात.

3) वात कमी करतात, आखडलेले अवयव मोकळे करतात

4) खारट पदार्थ हे सर्व चवींच्या विरुद्ध आहे

**अत्याधिक प्रमाणात खारट पदार्थ खाल्ल्यास पित्त वाढते,रक्त पातळ होते, तहान लागते,शरीरातील उष्णता वाढते, मांस दूषित होते,शरीरातील विष वाढतात,

**प्रजनन शक्ती कमी होते, ज्ञानेंद्रिय- कर्मेंद्रिये - मन ह्यांची विषय ग्रहणशक्ती मध्ये अडथळा येतो

**दात लवकर पडतात, टक्कल पडते,केश गळतात, ,पिकतात .शरीरावर सुरकुत्या पडतात.

**याशिवाय

- रक्तपित्त (bleeding  tendencies)

-अम्लपित्त(acidity), 

-विसर्प(fast spreading inflammatory diseases)  

-वातरक्त (Gout) 

-विचर्चिका (eczema)

इत्यादी अआजार होतात.


संदर्भ:-चरक सूत्रस्थान 26/43

खारट पदार्थ :- जसे वरुन  किंवा अधिक प्रमाणात मीठ खाणे, खारवलेले पदार्थ,खारट केलेले काजू बदाम इत्यादी, चायनीज पदार्थ-ओजिनोमोटो , निरनिराळे सॉस,चिप्स, फ्रेंच फ्राईज,लोणची,पापड, ठेचा इत्यादी.

Vd Pratibha Bhave, Pune 

8766740253

कडू पदार्थांचा शरीरावर परिणाम

1) कडू चवीचे पदार्थ आपल्याला खायला आवडत नाही.परंतु जीभेला चव नसेल तर कडू पदार्थ खाल्ल्याने चव पूर्ववत होते.जसे कारले, 

2) कडू पदार्थ शरीर निर्विष करतात.

3) कृमी,खाज, आग होणे, त्वचेचे रोग, वारंवार तहान लागणे, ताप येणे, ह्यासाठी कडू पदार्थाचा उपयोग होतो.

4) कडू पदार्थ भूक वाढवतात तसेच अन्नाचे पचन करतात. तसेच स्तनपान करणाऱ्या स्त्री च्या दुधामध्ये असलेले दोष दूर करुन दूध शुध्द करतात.

5) कडू पदार्थ शरीरातील, रक्तातील चिकटपणा,मेद , फॅट,स्त्राव, पू,घाम,मुत्र,मल,पित्त,कफ शोषून घेतात.

6) साधारणपणें कडू चवीचे पदार्थ पचायला हलके, गुणाने थंड व शरीरात कोरडेपणा निर्माण करणारे असतात.

7) अधिक प्रमाणात,सतत कडू पदार्थ घेतली तर शरीरात कोरडेपणा ,कडकपणा येतो. वजन कमी होते,शरीर बारीक होते, मनाची प्रसन्नता कमी होते.

चक्कर येणे, तोंड कोरडे पडणे, हाडे ठिसूळ होणे, सांधे झिजणे,तसेच इतर अनेक वाताचे आजार होतात.

संदर्भ:- चरक सूत्रस्थान 26/43-45

Vd Pratibha Bhave Pune

8766740253

गर्भिणीसाठी शिंगाडा (Water Chestnut)

1) गर्भिणीने अगदी गर्भ राहिल्या पासून  शिंगाडा खावा. त्यापासून बनवलेले निरनिराळे पदार्थ खावे.

2) शिंगाडा ताजा, शिंगड्याचे पीठ असे दोन्ही उपयोगात आणावे

3) ताजा शिंगाडा उकळून खावा.बाजारात शिजवलेले शिंगाडे मिळतात ते खावे.  मात्र प्रमाणात खावे. गर्भिणी ने रोज साधारणपणे 4ते 5शिंगाडे रोज खावे 

4)रव्याची/शेवयांची खीर करताना त्यात ताजा शिंगाडा किसून टाकावा

5)शिंगाड्याच्या पिठाचे लाडू ,शिरा करता येतो.

6)शिंगड्याच्या पिठाचे लाडू करताना पीठ साजूक तुपात भाजून घ्यावे. त्यात 

 पिठात मावेल ऐवढे भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट घालावे,त्यात पिठाच्या एक चतुर्थांश (¼) सुक्या नारळाचा किस मिसळावा. त्यात शेवटी मिक्सर मध्ये बारीक केलेले मनुके व साखर मिसळून लाडू करावे हे पौष्टिक लाडू गर्भिणी ने रोज 1 खावे. हे लाडू टिकतात.

1 लाडू  साधारणपणे 20gm -30gm वजनाचे असावे 

7) गर्भ पात होऊ नये म्हणून शिंगाडा खूप उपयोगी आहेत. गर्भिणी ने रोज दूधात 1चमचा  शिंगाड्याचे भाजलेले पीठ व चवीनुसार साखर मिसळून प्यावे.

***शृंगाटकं बिसं द्राक्षा कशेरु मधुकं सिता l

यथासंख्य प्रयोक्तव्या: गर्भस्त्रावे पयोयुत ll सु.शा. 10


*शिंगाड्याचे पीठ खात्रीचे घ्यावे. भेसळयुक्त नको*.


वैद्या प्रतिभा भावे, पुणे 8766740253

आरोग्यासाठी #आयुर्वेद

**वात पित्त कफ ह्यांना त्रिदोष म्हणतात.

आपल्या शरीरात वात पित्त व कफ योग्य ठिकाणी योग्य प्रमाणात ,योग्य स्वरुपात असले की आरोग्य मिळते.हे बिघडले की आजार होतात. 

** त्रिदोष बिघडण्याची 3 कारणे आहेत:-

1) काळ -पाऊस, उष्णता, थंडी ह्या लक्षणाने युक्त काळ अनियमित होणे

2) इंद्रियांचा (ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिेय, मन) असंतुलित

उपयोग करणे. -

जसे श्रवणेंद्रिय च्या बाबतीत -

अतिशय कर्कश आवाज सतत ऐकणे, आवाज अजिबातच न ऐकणे, तिरस्कार युक्त भीतीदायक आवाज ऐकणे. असेच इतर इंद्रियांच्या बाबतीत करणे.

 3) प्रज्ञापराध - बुध्दी दोषयुक्त होणे. धी, धृती, स्मृति भ्रष्ट झाल्यामुळे मनुष्य जे अशुभ कर्म करतो त्याला प्रज्ञापराध म्हणतात.

.हे अशुभ कर्म शारीरिक , वाचिक, मानसिक अशा पद्धतीने घडतात.

*कायिक (शारीरिक)- चोरी,मारामारी करणे,वेडेवाकडे झोपणे,अधिक साहस करणे, मलमुत्र इत्यादी वेग धारण करणे किंवा मुद्दाम वेग प्रवृत्त करणे, इत्यादी 

*वाचिक - कलह,भांडण, असंबद्ध, अशिष्ट, कठोर वाणी इत्यादी

*मानसिक - विनय सदाचार हीनता, क्रूरकर्मा, दुष्टकर्मा, दुराचारी लोकांशी मित्रता करणे,दुसऱ्याचे वाईट चिंतने, इत्यादी.

ह्या कारणांनी वात पित्त कफ असंतुलित होतात,तसेच मनाचा सत्वगुण कमी होऊन रजो व ,तमोगुण वाढतो. त्यामुळे अनेक आजार होतात.

 ह्या तीन त्यापैकी 'काळ'  मनुष्याच्या हातात नाही. परंतु इतर दोन कारणे दूर करता येतात.

*इंद्रिये नियंत्रण करणे,प्रज्ञापराध न करणे, योग, स्वस्थ्यवृत्त,दिनचर्या, ऋतुचर्या ,आचार रसायन, असे आरोग्याचे नियम पाळले तर शारीरिक व मानसिक स्वास्थ्य टिकून राहते. 

आरोग्य मिळवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असावे.


***************

Vd Pratibha Bhave pune

Ayurvedic Fertility Medicine - Fox Nut

मखान्न/मखाना Fox nut /Euryale ferox  मखान्नम् स्निग्ध वृष्यं च गर्भस्थापकं परम् l वातपित्त हरं बल्यं शीतं पित्तास्रदाह नुत् ll  आचार्य प्रिय...