1) गर्भाशयाचा व मानसिक भावनांचा अतिशय जवळचा संबंध आहे.
2) अत्याधिक मानसिक ताण व चिंता ह्यांचा गर्भाशय व हृदय ह्या दोन्ही अवयवांवर परीणाम होतो .
हृदयातील भावना गर्भाशयात पोहचत असतात.
3) आयुर्वेदात चिंता, भय ह्यामुळे रसदुष्टी होते असे म्हटले आहे . रसदुष्टि हे हृदयाचे आजार गर्भाशयाचे, पाळीच्या आजारांचे कारण आहे.
4) Chinese internal medicine मध्ये ह्यालाच 'Bao Mai' म्हणतात .
5) स्त्री ची मानसिक अवस्था ठीक नसेल तर पाळीमध्ये अनेक तक्रारी निर्माण होतात, गर्भाशयात गाठी तयार होतात,गर्भ धारणा होत नाही, वारंवार गर्भपात होतो.
6) मानसिक स्वास्थ उत्तम असेल तर मासिक पाळी नियमित होते व गर्भ राहण्यासाठी अडचण येत नाही.
7) सद्ध्या लोकांना मनाने मोकळे होता येत नाही. सतत तणावाखाली वावरतात असतात. अल्कोहोल, स्मोकिंग, इतर व्यसने वाढली आहेत.ताण कमी करण्यासाठी पाळीव प्राणी सुद्धा घरात ठेवतात. परंतु ह्या कशाचाही उपयोग होत नाही.
8) गर्भाशयाचे तसेच हृदयाचे काम व्यवस्थितपणे होण्यासाठी नियमीतपणे व्यायाम, योग, प्राणायाम ,समाजात वावरणे, सणासुदीला मनोरंजनासाठी एकत्र येणे, दिनचर्या, आहाराचे नियम पाळणे, गरजेनुसार औषधे,पंचकर्म, acupuncture करणे आवश्यक आहे
* मानसिक आरोग्य मिळवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असावे.***
Vd Pratibha Bhave ,Pune
8766740253
No comments:
Post a Comment