- साधारणपणे आंबट पदार्थ पचायला हलके, उष्ण गुणाचे व स्निग्ध असतात.
- आंबट पदार्थाने भोजनाला रुची येते
- आंबट पदार्थ मनाला तृप्त करतात,
- अन्नाचे पचन करतात, अधोमार्गाने वात बाहेर काढतात.
- शरीर शक्ती वाढवतात , इंद्रिय दृढ करतात, ह्रदयाला तृप्त करतात
- मुखात लालास्त्राव वाढवतात, भोजनाला ओलसरपणा आणतात,तसेच अन्नाचे पचन होताना आतड्याची गती वाढवतात
****
परंतु अत्याधिक प्रमाणात खाल्ले
- तर दात शिवशिवतात, आंबतात
- पित्त वाढते,खूप तहान लागते, रक्त दूषित होते, अंगाला सूज येऊ लागते(inflammatory)
- अंगावर किंवा शरीरात जखम असेल, हाड मोडले असेल, अंगावर सूज असेल अशा व्यक्तीने आंबट पदार्थ खाल्ले तर पूय (pus formation) निर्मिती होते
- कंठ, छाती व हृदयाच्या ठिकाणी जळजळ होते.
आंबट पदार्थ - दही, व्हिनेगर, चिंचा, कैरी, डोंगरी आवळा, न पिकलेली द्राक्षे, करवंद,आंबट बोरे संत्री इत्यादि
सन्दर्भ - चरक सूत्रस्थान 26/43
Vd Pratibha Bhave,Pune 8766740253
No comments:
Post a Comment