खारट पदार्थ शरीरात ओलसरपणा निर्माण करतात. अवयव मृदु करतात .तीक्ष्ण गुणाचे असतात. आहाराला रुची आणतात.गुणाने जरा स्निग्ध, थोडे उष्ण, व पचायला थोडे जड असतात.
1) योग्य प्रमाणात व योग्य स्वरूप घेतले तर भूक वाढवतात,
2) शरीरात साठलेले दोष ,मल पातळ करुन , मार्ग मोकळा करून बाहेर काढतात.
3) वात कमी करतात, आखडलेले अवयव मोकळे करतात
4) खारट पदार्थ हे सर्व चवींच्या विरुद्ध आहे
**अत्याधिक प्रमाणात खारट पदार्थ खाल्ल्यास पित्त वाढते,रक्त पातळ होते, तहान लागते,शरीरातील उष्णता वाढते, मांस दूषित होते,शरीरातील विष वाढतात,
**प्रजनन शक्ती कमी होते, ज्ञानेंद्रिय- कर्मेंद्रिये - मन ह्यांची विषय ग्रहणशक्ती मध्ये अडथळा येतो
**दात लवकर पडतात, टक्कल पडते,केश गळतात, ,पिकतात .शरीरावर सुरकुत्या पडतात.
**याशिवाय
- रक्तपित्त (bleeding tendencies)
-अम्लपित्त(acidity),
-विसर्प(fast spreading inflammatory diseases)
-वातरक्त (Gout)
-विचर्चिका (eczema)
इत्यादी अआजार होतात.
संदर्भ:-चरक सूत्रस्थान 26/43
खारट पदार्थ :- जसे वरुन किंवा अधिक प्रमाणात मीठ खाणे, खारवलेले पदार्थ,खारट केलेले काजू बदाम इत्यादी, चायनीज पदार्थ-ओजिनोमोटो , निरनिराळे सॉस,चिप्स, फ्रेंच फ्राईज,लोणची,पापड, ठेचा इत्यादी.
Vd Pratibha Bhave, Pune
8766740253
No comments:
Post a Comment