Friday, 9 February 2024

खारट पदार्थ

खारट पदार्थ शरीरात ओलसरपणा निर्माण करतात. अवयव मृदु करतात .तीक्ष्ण गुणाचे असतात. आहाराला रुची आणतात.गुणाने जरा स्निग्ध, थोडे उष्ण, व पचायला थोडे जड असतात.

1) योग्य प्रमाणात व योग्य स्वरूप घेतले तर भूक वाढवतात, 

2) शरीरात साठलेले दोष ,मल  पातळ करुन , मार्ग मोकळा करून बाहेर काढतात.

3) वात कमी करतात, आखडलेले अवयव मोकळे करतात

4) खारट पदार्थ हे सर्व चवींच्या विरुद्ध आहे

**अत्याधिक प्रमाणात खारट पदार्थ खाल्ल्यास पित्त वाढते,रक्त पातळ होते, तहान लागते,शरीरातील उष्णता वाढते, मांस दूषित होते,शरीरातील विष वाढतात,

**प्रजनन शक्ती कमी होते, ज्ञानेंद्रिय- कर्मेंद्रिये - मन ह्यांची विषय ग्रहणशक्ती मध्ये अडथळा येतो

**दात लवकर पडतात, टक्कल पडते,केश गळतात, ,पिकतात .शरीरावर सुरकुत्या पडतात.

**याशिवाय

- रक्तपित्त (bleeding  tendencies)

-अम्लपित्त(acidity), 

-विसर्प(fast spreading inflammatory diseases)  

-वातरक्त (Gout) 

-विचर्चिका (eczema)

इत्यादी अआजार होतात.


संदर्भ:-चरक सूत्रस्थान 26/43

खारट पदार्थ :- जसे वरुन  किंवा अधिक प्रमाणात मीठ खाणे, खारवलेले पदार्थ,खारट केलेले काजू बदाम इत्यादी, चायनीज पदार्थ-ओजिनोमोटो , निरनिराळे सॉस,चिप्स, फ्रेंच फ्राईज,लोणची,पापड, ठेचा इत्यादी.

Vd Pratibha Bhave, Pune 

8766740253

No comments:

Post a Comment

अगदी 15 दिवसात 40% टक्के #गुडघेदुखी थांबली डॉक्टर

 दिनांक 04/04/2025 ला त्या माझ्या क्लिनिक ला आल्या. माझ्या पेशंट च्या सासुबाई आहेत  पुण्यात विमाननगर येथे राहतात वय 65वर्षे वजन 74kg *******...