1) कडू चवीचे पदार्थ आपल्याला खायला आवडत नाही.परंतु जीभेला चव नसेल तर कडू पदार्थ खाल्ल्याने चव पूर्ववत होते.जसे कारले,
2) कडू पदार्थ शरीर निर्विष करतात.
3) कृमी,खाज, आग होणे, त्वचेचे रोग, वारंवार तहान लागणे, ताप येणे, ह्यासाठी कडू पदार्थाचा उपयोग होतो.
4) कडू पदार्थ भूक वाढवतात तसेच अन्नाचे पचन करतात. तसेच स्तनपान करणाऱ्या स्त्री च्या दुधामध्ये असलेले दोष दूर करुन दूध शुध्द करतात.
5) कडू पदार्थ शरीरातील, रक्तातील चिकटपणा,मेद , फॅट,स्त्राव, पू,घाम,मुत्र,मल,पित्त,कफ शोषून घेतात.
6) साधारणपणें कडू चवीचे पदार्थ पचायला हलके, गुणाने थंड व शरीरात कोरडेपणा निर्माण करणारे असतात.
7) अधिक प्रमाणात,सतत कडू पदार्थ घेतली तर शरीरात कोरडेपणा ,कडकपणा येतो. वजन कमी होते,शरीर बारीक होते, मनाची प्रसन्नता कमी होते.
चक्कर येणे, तोंड कोरडे पडणे, हाडे ठिसूळ होणे, सांधे झिजणे,तसेच इतर अनेक वाताचे आजार होतात.
संदर्भ:- चरक सूत्रस्थान 26/43-45
Vd Pratibha Bhave Pune
8766740253
No comments:
Post a Comment