रजोनिवृत्तिनंतरचा रक्तस्त्राव:-
साधारणतः 45-50 वर्षे हया वयात पाळी चे येणे पुर्णपणे थांबते.पाळी एक वर्ष पर्यंत आली नाही तर रजोनिवृत्ती (menopause) आहे असे समजावे.
****त्यानंतर मात्र अंगावर जाऊ लागले तर लगेच डॉक्टरांकडे दाखवावे.लपवू नये ,तसेच घरगुती उपाय करु .
रजोनिवृत्ती नंतर अंगावर लाल जाण्याची कारणे:-
1)Polyps/ग्रंथी: -गर्भाशयात , गर्भाशयाच्या मुखाशी मृदु कोंबासारखी वाढ दिसून येते.
हयामुळे कधी थेंब थेंब तर कधी भरपूर प्रमाणात रक्तस्त्राव होतो . मुख्यतः स्पर्श झाल्यास अधिक प्रमाणात होतो.
2)पाळी गेल्यावर गर्भाशयाच्या संबंधीत हार्मोन्सची मात्रेत बदल होतो . गर्भाशयाच्या आतील थर जाड झाल्यामुळे कधीकधी रक्तस्त्राव होतो.कधीकधी आतील थराच्या रचनेत विकृत बदल होऊन कॅन्सर ची शक्यता असते .
3)कधी कधी पाळी गेल्यावर गर्भाशयाच्या आतील थराचे पोषण होत नाही,ते खूपच पातळ होते, त्यामुळे सुद्धा रक्तस्त्राव होतो
3)पाळीच्या मार्गाचे (vagina)पोषण स्त्रीविशिष्ट हार्मोन्स ने होत असते.मेनोपॉज मुळे हा मार्ग रुक्ष होतो.तेथील त्वचा पातळ (Thin) होते त्यामुळे जंतुसंसर्गाने,स्पर्शाने, आघाताने रक्तस्त्राव होतो.
4)औषधी -रक्त पातळकरणाऱ्या औषधीं, हार्मोन्स,टॅमोक्सिफेन,
*****रक्तस्त्राव कशामुळे होतो हे शोधण्यासाठी सोनोग्राफी, गर्भाशयाचा आतील स्तराची दुर्बिणीतून तसेच मायक्रोस्कोपखाली तपासणी करणे.याद्वारे रक्तस्त्रावाचे कारण समजते*****
***उपचार-आधुनीक शास्त्रानुसार***
रक्तस्त्राव होण्याला जे कारण असेल त्याप्रमाणे उपचार केले जातात.जसे
-गर्भाशयाचा आतला थर जाड झाला असेल , ग्रंथी/polyps असतिल तर तो खरडून काढुन हार्मोन्स च्या गोळ्या देतात.तसेच रक्त स्त्राव थांबायचे औषध देतात.
-गर्भाशय आतिल अस्तर, (endometrium) पाळीच्यामार्गाची त्वचा पातळ झाली असेल तर हार्मोन्स च्या गोळ्या देतात . जंतुसंसर्ग असल्यास तशी औषध देतात
-कॅन्सर असल्यास शस्त्र क्रिया, केमोथेरपी,रेडियेशन आवश्यकता असेल त्याप्रमाणे केले जाते.
आयुर्वेदिक उपचार:-
1) जंतुसंसर्ग असल्यास आयुर्वेदिक औषधी पोटातून घेणे तसेच बाहरुन लावणे
2) योनीधावन,धुपन
3) अवगाह,निरुह व उत्तरबस्ति
4) औषधी पिचू (Tampon )
5) कॅन्सर असल्यास आवश्यकतेनुसार शस्त्रक्रिया