सौभाग्य शुण्ठीपाक
1)-प्रसूति झाल्यावर स्त्रियांनी घ्यायचे अतिशय महत्त्वाचे औषध आहे.
2)प्रसूति झाल्यावर स्त्रियांच्या शरिरातील झीज भरुन येण्यासाठी, दुध सुधारण्यासाठी खूप उपयोगी आहे.
3)प्रसूतिनंतर काही दिवसांनी थकवा जाणवत असल्यास ,केश गळत असल्यास अवश्य घ्यावे.
4) विवाहित स्त्रियांमध्ये श्वेतप्रदर-,रक्तप्रदर, पाळीच्या वेळी पोटात दुखणे अश्या तक्रारींसाठी खुप चांगले आहे.
5) हे औषध गर्भाशयाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.
6 )ह्या औषधाने बीजोत्पादन व बीजोत्सर्ग (development of follicles and ovulation) ही क्रिया सुधारते, त्यामुळे अपत्यप्राप्ती साठी वापर केला जातो.
7)हे औषध रस,रक्त शुद्ध करते.शरिरातील कृमी ,अतिरीक्त कफ,मल बाहेर काढुन टाकते.त्यामुळे उत्तम शरिरातील घटक उत्तमरीत्या तयार होतात. हया सर्वांच्या परिणामाने शरिराचा, चेहऱ्याच्या वर्ण सुधारतो.
8) हे औषध वांग,अकाली सुरकुत्या पडणे,केश पांढरे होणे ह्या तक्रारींसाठी उपयुक्त आहे.
******आयुर्वेदिक औषधी घेतांना प्रकृति, दोष, बल, पचनशक्ती इत्यादींचा विचार महत्त्वाचा आहे.
त्यामुळे आयुर्वेदिक डॉक्टर च्या सल्ल्यानेच औषधी घ्यावीत*********
No comments:
Post a Comment