सद्ध्या लहानमुलांना मध्ये मानसिक आजाराचे प्रमाण वाढले आहे. #AttentionDeficitHyperactivityDisorder(ADHD) ह्या मानसिक आजार चे प्रमाण सर्वाधिक आहे.
**#ADHD ची साधारणपणे आढळणारी लक्षणे:-
- ही मुले स्वतः च्याच विश्वात असतात. दुसऱ्यांच्या भावना समजू शकत नाही
- भावना फक्त स्वतः पूरत्याच मर्यादित असल्याने मनासारखे झाले नाही तर तांडव करतात. समजावून सांगणे अवघड असते
- दुसऱ्यांच्या कामात मुद्दाम व्यत्यय आणतात
- विनाकारण खूप चिडणे, रागाने अंगावर धावून येणे,वस्तू फेकणे, मारणे अशी लक्षणे दिसतात
- ही मुले एका जागेवर स्थिर राहत नाही. सारखे फिरत राहतात, पळतात. जबरदस्तीने खुर्चीत बसवले तर चुळबुळ करतात, मान, डोळे, हातपाय हलवतात.
- अशा मुलांना व्यवस्थितपणे खेळणे अवघड जाते. चित्र काढणे, पेंटिंग करणे संगित शिकणे,अशा इतर कला शिकण्यासाठी एकाग्रता नसते.
- अनेक काम करण्यासाठी ही मुले इच्छा आहे असे दाखवू शकतात पण ते पूर्ण करु शकत नाही. एक काम अर्धवट सोडून दुसरे करायला लागतात.
- एकाग्रता नसल्याने आपण जे बोललो तेच परत सांगायला लावले तर ते जमत नाही.
- बुद्धी चे काम करतांना ताण पडतो म्हणून ते करायला टाळाटाळ करतात. बराचवेळ कामे विसरून जातात. ही मुले शाळेत मागे पडतात
- सांगितलेल्या गोष्टी पार पाडणे त्यांना कठीण जाते त्यामुळे खुप चुका होतात. ह्याचा अर्थ ते बुद्धी ने मंद असतात किंवा आळशी असतात असे नव्हे.
- काही मुलांमध्ये स्वप्नाळूपणा दिसून येतो .ही शांत बसून राहतात व इतर मुलांशी अजिबात मिसळत नाही. बाहेर काय चालले आहे ह्याचे भान नसते
- जर व्यवस्थित उपाय केले नाही तर ही मुले मोठी झाल्यावर इतर त्याच्या वयाच्या मुलाप्रमाणे वैचारिक प्रगल्भता नसते. Driving skill, निर्णय क्षमतेची कमतरता आढळते.म्हणून अशा मुलांसाठी बाल्यावस्थेपासूनच मानसिक स्वास्थ्यासाठी प्रयत्नशील असायला हवे
************
आजार दूर करण्यासाठी उपाययोजना :-
************
मनोविकार तज्ञ केमिकल औषधांनी हा आजार 80%नियंत्रणात आणतात, परंतु त्या औषधांचे ह्या लहान मुलांवर खुप वाईट परिणाम होतात.
-आयुर्वेदिक उपचार -
*********
*आयुर्वेदीक पद्धती ने हा आजार खूप चांगल्या प्रकारे नियंत्रणात आणला जातो. तसेच औषधे बिनविषारी आहेत. जसे
*ब्राम्ही, शंखपुष्पी, अश्वगंधा, जेष्ठमध, जटामांसी वेखंड, पिंपळी, कुमारकल्याणघृत इत्यादी औषधे योग्य प्रमाणात दिली जातात
*तसेच षष्ठीशाली पिंडाने/औषधीयुक्त तेलाने संपूर्ण शरीराची मालिश केली जाते
*दुधाची धार, विशिष्ट अंतरावर, 30ते 45 मिनिटे सतत कपाळावर विशिष्ट पद्धतीने सोडणे. असे दर महिन्याला 14 दिवस
*श्लोक पाठांतर करुन घेणे
*व्यायाम करवून घेणे
*आहार व दिनचर्या ठरवून देणे.
ह्या सारख्या आयुर्वेदिक उपायांनी मानसिक आजार बरा होतो.
Vd Pratibha Bhave
BAMS MD Ayu
Obstetrics and gynecology
8766740253
No comments:
Post a Comment