#गर्भ राहण्याआधी स्री व पुरुषाने संतुलित आहार करावा.
*आहारात बदाम, अक्रोड, पिस्ता, खारीक, ताज्या फळभाज्या, शेंगा, पालेभाज्या, दूध, तूप, मूग, 6महिने जुने तांदुळ , ज्वारी, नाचणी, ऋतु नुसार मिळणारी ताजी फळे ह्याचा समावेश करावा.
*डब्बा बंद खाद्यपदार्थ, शिळे, आंबवलेले पदार्थ, बेकरी, मैदा, सोडा घालून केलेले तेलकट, अतिशय तिखट, आंबट, खारट चवीचे पदार्थ खाऊ नये. दही रोज खाऊ नये. अर्ध कच्चे व स्वच्छ न धुतलेले अन्नपदार्थ टाळावे.
*नेहमी आनंदी, उत्साहात असावे. प्राणायाम व योगासने करावी. चित्त शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा. रोज शांत झोप घ्यावी.
*जागरण करु नये. वादविवाद टाळावे.
*गर्भ धारणा करण्याआधी दोघांनीही पंचकर्म, #उत्तरबस्ति ने शरीरशुद्धी करुन घ्यावी.
*आहारशुद्धी, मन शुद्धी व शरीरशुद्धी झाली तर उत्तम बीजे तयार होते. उत्तम बीजापासून सुदृढ अपत्यप्राप्ती होते
**सुदृढ अपत्यप्राप्ती साठी नियोजनपूर्वक गर्भधारणा असावी असे आयुर्वेदाचे ठाम मत आहे. त्यासाठी आयुर्वेदात #'गर्भाधानविधी 'सांगितला आहे. ***
Vd Pratibha Bhave
BAMS MD Ayu
Obstetrics and gynecology
8766740253
No comments:
Post a Comment