- बुद्धीवर्धन औषधे बालपणापासून द्यावी असे आयुर्वेद सांगतो
- आवश्यकतेनुसार बुद्धी वर्धक औषधी निवडावी लागतात
- बुद्धीवर्धन करणारी औषधे वेगवेगळ्या गुणांची व चवीचे असतात.
- मज्जा धातुक्षयक्षयाची लक्षणे असली तर गोड चवीची औषधी बुद्धी वाढवण्यासाठी उपयोगी ठरतात. जसे गाईचे दूध, तूप ,शतावरी अशी औषधे मज्जा धातूचे बृहण करुन बुद्धी वाढवतात.
- काही कडू औषधे जसे ब्राह्मी, जटामांसी, निर्गुण्डी. ही औषधे बुद्धीचा जडत्व कमी करून बुद्धिवर्धनासाठी उपयोगी ठरतात
- तिखट औषधी साधक पित्त वाढवून बुद्धिवर्धन करतात जसे लसुन, ज्योतिष्मती, वेखंड.
- काही रसायन औषधी जसे हिरडा सर्व शरिरातील साठलेला मल बाहेर काढतो. , कफ, मेद नष्ट करतो. त्यामुळे ज्ञानेंद्रियांची शिथिलता दूर होऊन बुद्धिवर्धन होते.
*****सर्व आयुर्वेदिक औषधे आयुर्वेद तज्ञ कडूनच घ्यावी ********
No comments:
Post a Comment