"महिलांनो जाग्या व्हा
आपल्या मुलामुलींना भारतीय पद्धतीने बनवलेला आहार द्या. भावी पिढी निरोगी बनवा"
*******************************************
2 sep 2019, Times of India मध्ये एक बातमी वाचली.
"Bristol, England येथील 18 वर्षांचा मुलगा अंध झाला."
****तो अंध का झाला हे खूप महत्वाचे आहे.
तेथील डॉक्टरांनी केलेल्या परिक्षणांमध्ये असे आढळले कि, वयाच्या 3 ऱ्या वर्षापासून त्याचा आहारत रोज तळलेले मासे, चिप्स व प्रिंगल्स (Kellogg), पांढरा ब्रेड, हॅम स्लाईस, साॅसेज हेच पदार्थ होते. त्यामुळे त्याला वयाच्या 15 वर्षी बहिरेपणाआला व 18व्या वर्षी तो आंधळा झाला.
*अशा प्रकारच्या आहाराने लठ्ठपणा, ह्दयरोग, कॅन्सर असे आजार होतातच पण ह्याशिवाय आपले ज्ञानेंद्रिय व कर्मेन्द्रिय निर्बल व दुर्बल होतात.
*भारतीय आहार हा प्रदेशानुसार निरनिराळा आहे. सणवारांच्या निमित्ताने अनेक खास पदार्थ बनवले जातात.
*भारतीय आहारात गोड, तिखट,आंबट,खारट,कडू,तुरट अशा सर्व चवींच्या पदार्थांचा समावेश आहे. ह्यालाच आयुर्वेदात षड्रसात्मक आहार म्हणतात. स्वास्थ्यासाठी असा आहार आवश्यक आहे.
*भारतीय परंपरेलाच अनुसरून पाककृती ने खाद्यपदार्थ बनवून कुटुबाला स्वास्थ्य, आरोग्य प्रदान करा.
No comments:
Post a Comment