1) नेहमीच शरीराचे हित करणारा आहार करावा.
2) हा आहार प्रसन्न मनाने घ्यावा.
3) हितकर आहार प्रसन्न मनाने घेतला तर मन संतुष्ट होते.
4) मन संतुष्ट झाल्यास शरीराला उर्जा मिळते.
5) शारीरिक व मानसिक बळ वाढते.
6) सुख समाधान मिळते
7) व्याधी,आजार,दुर्बलता नष्ट होतात
संदर्भ - चरक चिकित्सा 30/329
**प्रसन्न मनाने भोजन केले की त्याचे पचन योग्य प्रकारे होते. शुध्द मनाच्या स्थितित प्राणवायु चा संचार योग्य रुपाने होतो. त्यामुळे अन्नाचे पचन योग्य प्रकारे होऊन आजार बरे होतात.
संदर्भ - योग वशिष्ठ–
आनंदो वर्धते देहे शुद्धे चेतसि राघव l
सत्व शुद्धया वहन्त्येते क्रमेण प्राणवायव: ll
जीर्यन्ति तथान्नानि व्याधिस्तेन विनश्यति l
***म्हणून रोगी - निरोगी अशा कुठल्याही अवस्थेत, योग्य आहार प्रसन्न मनाने घ्यावा व शरीराचे , मनाचे स्वास्थ्य टिकवावे.
Vd Pratibha Bhave Pune
8766740253
No comments:
Post a Comment