Sunday, 4 June 2023

पंचकर्म

शरीरात घातक, विषारी पदार्थ साठले की पंचकर्मातील वमन, विरेचन हे कर्म करावे.

# वमन म्हणजे आयुर्वेदिक औषधाने शरीरातील विषारी पदार्थ उलटी करून बाहेर काढणे.

# विरेचन म्हणजे विषारी पदार्थ शौचावाटे बाहेर काढणे.


* आपल्या शरीरात खूप दोष,विषारी पदार्थ साठले आहेत हे लक्षणाने कसे ओळखायचे हे आयुर्वेदात सांगितले आहे.

ही लक्षणे पुढील प्रमाणे –

  • अन्नाचे पचन न होणे, अन्न बेचव वाटणे
  • लठ्ठपणा येणे, त्वचेचा पांढरटपणा,शरीर जड वाटणे, विनाकारण थकवा येणे,थोडे काम केले तरी थकवा वाटणे, दुर्बलता येणे
  • शरीरावर छोट्या छोट्या पुळ्या येणे,चट्टे येणे,खाज येणे, दुर्गंध येणे
  • शरीर व मनात उदासीनता येणे, 
  • मळमळ होणे,उलटी होणे, पित्त कफ पडणे
  • झोप न येणे किंवा खूप झोप येणे, सारखे झोपावे असे वाटणे,
  • नपुंसकत्व 
  • बुध्दी न चालणे,
  • अशुभ स्वप्न पडणे
  • पौष्टिक पदार्थांचे भरपूर सेवन केले तरी शरीरातील ताकद कमी होणे, तेज कमी होणे.


ही सर्व  लक्षणांना आयुर्वेदात  'बहुदोषा ' म्हटले आहे. संदर्भ च. सू.16/16

अशा व्यक्तींना त्याचे बळ व दोष कसे आहेत ह्याचे परीक्षण करून मग वमन विरेचन केले जाते.


Vd Pratibha Bhave,Pune 8766740253

No comments:

Post a Comment

Ayurvedic Fertility Medicine - Fox Nut

मखान्न/मखाना Fox nut /Euryale ferox  मखान्नम् स्निग्ध वृष्यं च गर्भस्थापकं परम् l वातपित्त हरं बल्यं शीतं पित्तास्रदाह नुत् ll  आचार्य प्रिय...