आयुर्वेदात बल वाढवणारे 13 घटक सूत्र रुपात सांगितले आहेत.संदर्भ च. शा.6/13
1) बलवान व्यक्तींच्या देशात जन्म
(देशाचा -वातावरणाचा परिणाम) जसे पंजाब
2) बलवान व्यक्तींच्या घरात जन्म (माता- पिता प्रमाणे)
3) बलवान काळात जन्म
(विसर्ग काळ-वर्षा शरद हेमंत ऋतु )
4) काळ,ऋतु चे योग्य असणे. समयोग असणे
5) स्त्रीबीज,पुरुषबीज, व गर्भाशय उत्तम गुणाने युक्त असणे. ह्यात कुठलाही आजार नसावा
6) पथ्यकर आहार निरंतर घेणे
7) शरीराचे संपूर्ण अवयव परिपूर्ण असणे
8) पौष्टीक आहार पचवण्यास समर्थ असणे
9) मन सद्गुण युक्त असणे
10) नैसर्गिकपणे बल निर्माण होणे
11) युवावस्था
12) बल वाढवण्यासाठी व्यायाम,आसन इत्यादी कर्म करणे
13) प्रसन्न असणे. चिंता शोक इत्यादींपासून दूर राहून नेहमी निरंतर प्रसन्न राहणे.
ह्या सर्व घटकांचा अभ्यास केला तर असे लक्षात येते की बलवान अपत्य जन्माला येण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले तर शक्य आहे. कोणत्या महिन्यात गर्भधारणा करावी, कधी करावी, आहार कसा घ्यावा, पथ्यकर आहार म्हणजे काय हे भावी पालकाने समजून घ्यावे.
#पंचकर्म #उत्तरबस्ती, आहाराने शरीर,मन,बीज, #गर्भाशय शुद्धी करुन मगच गर्भधारणा करावी.
Vd Pratibha Bhave Pune
8766740253