Tuesday, 2 May 2023

आजारपण शरीराचे व मनाचे

-#आयुर्वेदानुसार  मनुष्यात कधी शरीराला तर कधी मनाला आजार होतात.

  •  वात, पित्त, कफ ह्यांचे संतुलन बिघडले की शरीराला आजार होतात. जसे सर्दी,खोकला, मलब्धता , उलटी,इत्यादी 
  • मनात रज व तम वाढल्यावर  मनाला आजार होतात. जसे उन्माद,अपस्मार,उदासीनता, इत्यादी 
  •  शारीरिक आजार मनाला दुःख देतात व मानसिक आजार सुद्धा शरीरावर परिणाम करतात. 
  • शारीरिक आजारासाठी वात पित्त कफ संतुलित करण्यासाठी उपाय केल्या जाते. मानसिक आजारात सत्व गुण वाढवण्याकरता उपाय केल्या जातात.
  • पंचकर्म उपचार हे शारीरिक व मानसिक दोन्ही आजारासाठी उपयुक्त आहेत. पंचकर्म केल्याने शरीर शुद्धी होते त्याचबरोबर #मानसिक शुद्धी होते.
  • - रोगाचे स्वरूप,,रोगाचे कारण, रोग्याचे बल,ऋतू, अशा अनेक कारणांचा विचार करून पंचकर्म,औषधे, पथ्यापथ्य, आहार,विहार,दिनचर्या ठरवली जाते.


Vd Pratibha Bhave,Pune

No comments:

Post a Comment

Regimen of diet according to Ayurveda (भोजन करण्याचे आयुर्वेदोक्त नियम)

1) काले – Food should be taken at the proper time, 2)   सात्म्ये-food should be familial, acceptable  3) शुचि – it should be clean 4) हितं -...