लांबसडक, घनदाट,चमकदार, केस असले की आपण तिला सुकेशिनी म्हणतो.
सुकेशिनी असणे हे उत्तम शारीरिक व मानसिक आरोग्याचे लक्षण आहे.
आयुर्वेदात केसांच्या आरोग्यासाठी केशसंजनन, केशवर्धन,केशरंजन अशा औषधांचा उपयोग केला जातो.
केशसंजनन:- ह्या औषधाने शरीरात हाडे, नख, केश मजबूत होतात
केश वर्धन - ह्या औषधाने केश वाढवतात, पोत सुधारतो व केश जाड होतात.
केश रंजन - ही औषधे केसांचे रंग सुधारण्यासाठी होतो.
आयुर्वेदात केसांच्या आरोग्यासाठी अनेक औषधी आहेत.
*****केसांचे आजार:-**********
*खालित्य (केश गळणे)
*पलित्य (अकाली केश पिकने)
* इंद्र लुप्त (चाई)
ह्यासाठी विशेषतः औषधी उपचार सांगितले आहेत.
***केश का गळतात?
केसांच्या मुळाशी असलेले वात, पित्त कफ व रक्त ह्यात असंतुलन निर्माण होऊन केसांच्या मुळाशी पोषक तत्वे पोहचू शकत नाही त्यामुळे केश गळू लागतात.
-आधुनिक शास्त्रानुसार तरुणांमध्ये केश गळण्याचे मुख्य कारण
*हॉर्मोन्स मध्ये बदल, उदा.-PCOS, Thyroid
*केसांची वेगवेगळी style सारखी बदलणे
*केमिकल्स चा अधिक वापर
*काही औषधी सतत घेणे
*पोषक तत्वांची कमतरता
*आजापणामुळे
**Delivery झाल्यावर हॉर्मोन्स मध्ये अचानक बदल झाल्यामुळे खूप केश गळतात. पण 6महिन्याने पुन्हा छान केश येतात.
****केश का पिकतात?
जेव्हा कुठल्याही कारणाने पित्त बिघडले की ते उष्ण, तीक्ष्ण, सूक्ष्म ह्या गुणामुळे केसांच्या मुळाशी जाऊन केसांना अकाली पांढरे करतो. अशा प्रकारे केश पिकतात, पांढरी होतात.
*आधुनिक शास्त्रा च्या मते -शरीरात protein ची कमतरता,copper,Iron ची कमतरता असेल तर केश अकाली पांढरी होतात.ही कमतरता कमी झाली की पुन्हा केसांचा रंग काळा होतो.
-काही medicines,
-जुनाट आजार ह्यामुळे सुद्धा केश पांढरे होतात.
- लवकर केश पिकणे हे वंशपरंरागत सुद्धा असू शकते.
ह्यासाठी आयुर्वेदात नस्य,बस्ति,औषधी ,शिरोधारा अशा उपचाराने खूप सुधारणा होते.
*****चाई पडणे हे सुद्धा दिसून येते.आयुर्वेद मते हे विशिष्ट हे कृमी मुळे घडते , त्यानुसार उपचार केले की 7 दिवसात त्या ठिकाणी केश येऊ लागतात.
*****ह्याशिवाय केसात कोंडा होणे ही तक्रार असते. त्यासाठी केश धुण्यासाठी, केसांना लावण्यासाठी औषधं दिली की 15दिवसात पूर्ण कोंडा जातो.
***केसांच्या अशा अनेक समस्या आयुर्वेदाने बऱ्या होतात.******************
Vd Pratibha Bhave Pune 8766740253
No comments:
Post a Comment