- तारुण्य व प्रतिकारशक्ती टिकवण्यासाठी हे प्रसिध्द आयुर्वेदिक औषध आहे . निरोगी मनुष्यासाठी आरोग्य टिकवणारे व रोगी मनुष्याचे रोग दूर करणारे आहे.
- हे औषध गर्भिणी, बालक, तरुण स्री, पुरुष व वृध्दांसाठी उपयोगी आहे. गर्भाशयाचे आजार, शुक्र, वीर्याच्या तक्रारी दूर करुन सुदृढ अपत्यप्राप्ती साठी दिल्या जाते.
- पचनशक्ति, वय ह्याचा विचार करुन हे औषध सर्व ऋतुंमध्ये घ्यावे.
- ह्या औषधात जवळपास 40 आयुर्वेदिक वनस्पती वापरल्या आहेत. आवळा हा त्यातील प्रमुख आहे.
- ह्या औषधाने शरीरातील सर्व अवयव स्वच्छ होतात,पोट साफ होते. अजीर्ण, पोट गच्च होणे, मलबद्धता ह्या तक्रारींसाठी सकाळी च्यवनप्राश व सायंकाळी जेवणानंतर द्राक्षासव घ्यावे.
- हृदयरोग, छातीत धडधडणे, खोकला, दमा, वातरक्त (gout), कफरोग, वातरोग, अम्लपित्त (Acidity ), पित्तरोग, मुत्ररोग, शुक्ररोग, क्षयरोग ह्या आजारांत हे औषध वापरले जाते.
- बुद्धी, स्मरणशक्ती, स्फुर्ती, प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी दिले जाते.
- हे औषध नियमीतपणे खाल्ले तर केस गळणे, पिकणे, त्वचेवर सुरकुत्या येणे, अशी वार्धक्याची लक्षणे लवकर निर्माण होत नाही.
- मृगशृंग नावाचे औषध च्यवनप्राश सोबत दिल्याने हाडे मजबूत होतात.
- लहान मुलांचे वजन वाढण्यासाठी, धष्टपुष्ट करण्यासाठी, भूक वाढण्यासाठी हे अतिशय गुणकारी आहे.
- शरिरातील रक्त कमी झाल्यास लोहभस्म, अभ्रकभस्म, मण्डुरभस्म च्यवनप्राश सोबत दिल्याने रक्त वाढते
- च्यवनप्राश मध्ये मकरध्वज, अभ्रकभस्म, मृगशृंग भस्म, चांदी - सोने वर्क, केशर इत्यादी औषधी मिसळल्यावर त्याला स्पेशल च्यवनप्राश म्हणतात. ह्याने लवकर गुण येतो.
**टीप:
चांगल्या प्रतीचा च्यवनप्राश गडद लाल रंगाचा, चवीला गोड आंबट, सुगंधीत असतो.निरोगी मनुष्याने आपले आरोग्य टिकवण्यासाठी पंचकर्म करुन त्यानंतर हे औषध घ्यावे.
No comments:
Post a Comment